शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

भरकटलेल्या वाटेवर विरोधीपक्ष, नागरी प्रश्नांबाबत सामाजिक संघटनाच दक्ष

By अविनाश कोळी | Published: January 29, 2024 4:32 PM

पदरमोड करून आंदोलन

अविनाश कोळीलोकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सत्तेच्या पटावर मुशाफिरी करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांचीच असते. मात्र, सत्ताधारी जर राजकारणातच मश्गुल राहिले तर विरोधी पक्षाने नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करावा, अशी अपेक्षा असते. सांगली जिल्ह्यातील अनेक नागरी प्रश्नांशी सर्वपक्षीय काडीमोड झाल्याने सामाजिक संघटनांना याचा भार आपल्या खांद्यावर घ्यावा लागला. रेल्वेस्थानक, उड्डाणपूल, रस्ते इतकेच काय नदीत पाणी आणण्यापर्यंतची कामे दबावगटाच्या माध्यमातून संघटना यशस्वीपणे करीत आहेत.सांगली : सांगली जिल्हा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. दिग्गज नेत्यांचा व राज्यात दबदबा असणाऱ्या नेत्यांचा हा जिल्हा समजला जातो. आजही सत्ताधारी तसेच विरोधी गटाकडे तितकेच ताकदवान नेते आहेत. सत्तेत काेणीही असले तरी विरोधात असणाऱ्या नेत्यांनी काही वर्षांपूर्वीपर्यंत केलेली आंदोलने राज्यभर गाजली. दखल घ्यावीत, अशी आंदोलने करण्यापेक्षा निदर्शने, धरणे आंदोलनाची औपचारिकता पार पाडली जाते. पाठपुरावा करीत प्रश्न तडीस नेण्याची पद्धत राजकीय स्तरावर लोप पावत आहे.

राजकीय स्तरावर उदासीनतेचे वारे वाहत असताना सामाजिक संघटनांनी याचा भार खांद्यावर उचलत नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास सुरुवात केली. कृष्णा नदी पहापूर नियंत्रण कृती समितीने शनिवारी कृष्णा नदी कोरडी पडली म्हणून नदीत उतरून आंदोलन केले. दोन दिवसांपासून याचा बोभाटा झाल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग आली. कोयनेतून सोडलेले पाणी नंतर नदीत दाखलही झाले. तरीही पाण्याच्या गैरनियोजनाची पोलखोल या संघटनेने केलीच.सांगली रेल्वेस्थानकावर प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पादचारी पूल नसल्याबद्दल नागरिक जागृती मंचने आंदोलन केले. महाव्यवस्थापकांच्या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी कोंडी केल्यानंतर प्रश्न सुटला. रेल्वे प्रशासनाने दखल घेत स्थानकावरील कामे मंजूर केली. मिरजेच्या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न जिवंत ठेवून राजकीय नेत्यांची कोंडी करण्याचे कामही याच संघटना करीत आहेत.

पदरमोड करून आंदोलन

सांगलीतील नागरिक जागृती मंच, कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती, मिरज शहर सुधार समिती, काही रेल्वे प्रवासी संघटना नागरिकांच्या प्रश्नांसाठी झटताना दिसत आहेत. कागदपत्रांची जमावाजमव करण्यापासून प्रवास करण्यापर्यंत पडरमोड करून ते कर्तव्यभावनेने प्रश्नांचा पाठलाग करतात.

विरोधी पक्षांचे चाललेय काय?विरोधात असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी केवळ राजकारणात व्यस्त दिसताहेत. महाआघाडी म्हणून या पक्षांनी कधीही एकत्र येत नागरी प्रश्नावर एकही आंदोलन केले नाही. प्रश्नांचा पाठपुरावा करून किंवा सत्ताधाऱ्यांना जेरीस आणून प्रश्न सोडविल्याचेही ऐकिवात नाही.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण