शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

४०० चा दुसरा हप्ता द्या, मगच कारखाने सुरू करा; राजू शेट्टींच्या आक्रोश पदयात्रेला पुन्हा सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 12:55 PM

मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत पदयात्रा ३० ऑक्टोबर रोजी स्थगित केली होती

इस्लामपूर : साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामात चांगला पैसा मिळवला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन घेण्यासाठीचा भांडवली खर्च वाढल्याने शेतकरी आतबट्ट्यात येत आहे. त्यामुळे कारखान्यांनी चालू गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ४०० रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी माजी खा. राजू शेट्टी यांनी केली.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने ऊस दराच्या आंदोलनाचा भाग म्हणून शेट्टी यांनी १७ ऑक्टोबरपासून आक्रोश पदयात्रेला सुरुवात केली होती. १३ दिवसांत ३०० कि. मी. अंतराचा टप्पा पायी चालत गाठला होता. मात्र मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून सगळीकडे अस्वस्थता पसरली होती. त्यामुळे शेट्टी यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देत आपली पदयात्रा ३० ऑक्टोबर रोजी स्थगित केली होती.मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी त्यांचे उपोषण गुरुवारी स्थगित केल्यानंतर माजी खा. शेट्टी यांनी तातडीने निर्णय घेत साखराळे येथील राजारामबापू कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन आपल्या आक्रोश पदयात्रेला सुरुवात केली.यावेळी शेट्टी यांनी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली यांना निवेदन देऊन ४०० रुपयांचा हप्ता दिल्याशिवाय कारखाना सुरू करू नका, अशी विनंती केली. यावेळी त्यांनी राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.शेट्टी म्हणाले, साखर कारखानदारांनी गाळप क्षमता वाढवताना या खर्चाचा बोजा शेतकऱ्यांवर टाकला आहे. कोट्यवधी रुपयांचा चुराडा करून प्रकल्प उभे केले जात आहेत. या प्रकल्पाच्या कर्जाचा बोजा कारखान्यांनी शेतकऱ्यांना ज्यादा आलेल्या उत्पन्नातील हिश्श्यावर टाकला आहे. त्यामुळे कोणतेही कारण न सांगता कारखान्यांनी ४०० चा दुसरा हप्ता मिळावा.शेतकऱ्यांना मातीत गाडण्यासाठी कारखानदार, केंद्र सरकार आणि विरोधीपक्ष हातात हात घालून काम करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. आर. डी. माहुली यांनी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कारखानदारांसमोर निर्माण झालेल्या समस्यांचा पाढा वाचला.यावेळी संचालक कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, शैलेश पाटील, हणमंत माळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, स्वाभिमानीचे आप्पासाहेब पाटील, अॅड. एस. व्ही. संदे, भागवत जाधव उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीRaju Shettyराजू शेट्टीSugar factoryसाखर कारखाने