शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
3
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
4
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
5
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
6
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
7
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
8
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
9
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
10
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
11
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
12
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
13
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
14
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
15
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
16
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
17
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
18
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
19
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
20
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!

शहरामध्ये संपेनात डास आणि म्हणे तासगावचा झाला विकास!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 2:11 PM

कोट्यवधीच्या विकासाच्या उड्डाणांनी तासगावकरांऐवजी कारभाऱ्यांचाच विकास झाल्याची चर्चा

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत कोट्यवधीचा विकास केला. याचा गाजावाजा सुरू आहे; मात्र कोट्यवधीच्या विकासाच्या उड्डाणांनी तासगावकरांऐवजी कारभाऱ्यांचाच विकास झाल्याची चर्चा आहे. सामान्यांना अभिप्रेत विकासकामांऐवजी कारभाऱ्यांच्या सोयीनुसार खर्ची पडलेला निधी कुचकामी ठरला आहे. डासांच्या बाबतीत नेहमीच ‘हाय रिस्क’मध्ये असलेल्या ‘शहरात संपेनात डास; म्हणे तासगावचा विकास’ अशीच निराशाजनक प्रतिक्रिया उमटत आहे.

खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तासगावकरांनी पाच वर्षांपूर्वी भाजपच्या हातात तासगाव नगरपालिकेची सत्ता दिली. खासदारांनी वजन वापरून कोट्यवधीचा निधी शहराच्या विकासासाठी आणला. पाच वर्षांत कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र यातून सामान्य जनतेला होणारा त्रास कितपत कमी झाला, या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. गटार फोडून रस्ता, रस्ता फोडून गटार, दगडी फरशी काढून पेव्हिंग ब्लॉक, पेव्हिंग ब्लॉक काढून काँक्रिटीकरण, असा विळा मोडून खुरपे करण्यासारखा विकास गेल्या पाच वर्षांत करण्यात आला.

काम कोणतेही होऊ दे, आमचं चांगभलं झालं पाहिजे, असाच एकूण विकासाचा रागरंग राहिला. स्वच्छतेच्या बेकायदेशीर ठेक्यापासून, लादलेल्या भुयारी गटारीच्या योजनेपर्यंत अनेक कामांवर कोट्यवधी रुपये खर्ची पडले. काम मंजूर करण्याआधीपासूनच स्वहित किती साधले जाईल, याकडे जादा लक्ष असायचे. स्वत:च्या प्रभागात काम होणार असेल तर मर्जीतील ठेकेदारालाच काम मिळावे, यासाठी अनेक आकांडतांडव केले; मात्र कामाच्या दर्जाबाबत नेहमीच मौन धरले.

कोट्यवधींचा दिखावा करण्याऐवजी केवळ डासमुक्त तासगाव शहर केले असते तरीदेखील दिलासा मिळाला असता. शहर अनेक वर्षांपासून सातत्याने डासांच्या घनतेत ‘हाय रिस्क’मध्ये आहे. अगदी जानेवारीत झालेल्या सर्वेक्षणातदेखील डासांच्या घनतेचा गृहनिर्देशांक ११.५३ आहे. दहा टक्क्यांच्या खाली शहरातील डासांची घनता कधीच आली नाही. परिणामी खासगी रुग्णालये नेहमीच गर्दीने भरलेले असतात. डेंग्यू, चिकुनगुनिया, हिवताप, मलेरिया अशा साथीच्या आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच पाच वर्षांच्या कारभाराचे मूल्यांकन या डासयुक्त तासगाववरूनच दिसून येत आहे.

शाळा, नाट्यगृह कौतुकास्पद

पाच वर्षांच्या नगरपालिकेच्या शाळांनी कात टाकली आहे. खासगी शाळांच्या तोडीस तोड उपक्रम आणि गुणवत्ता यामुळे शाळांचा नावलौकिक झाला आहे. नगरपालिकेने शाळांबाबत घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. नाट्यगृह नूतनीकरणासारखे काही निर्णय शहराचे हित साधणारे असल्याची भावनाही व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली