शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सांगली जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचे पैसे जमा, किती शेतकरी लाभापासून वंचित..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:08 IST

तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून मिळतात पैसे

सांगली : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ जिल्ह्यातील चार लाख ७३० शेतकरी घेत आहेत. पीएम किसान योजनेत वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. या योजनेत शेतकऱ्यांना १९ वा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला असून, जिल्ह्यातील चार लाख ७३० शेतकऱ्यांच्या खात्यावर ८० कोटी १४ लाख ६० हजार रुपये जमा झाले आहेत.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून प्रत्येक हप्त्याला २ हजार प्रमाणे वर्षाला ३ हप्ते म्हणजे ६ हजार रुपयांचा लाभ दिला जातो. याचा लाभ डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जातो. केंद्र शासनाकडून १९ हप्त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला आहे. हा लाभ नियमित मिळण्यासाठी दरवर्षी केवायसी करणे बंधनकारक असते.मात्र, शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश देऊनही हजारो शेतकरी लाभापासून दूर आहेत. जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी चार लाख ११ हजार ३४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी तीन हजार ३५२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही. यामुळे त्यांना पीएम किसान योजनेपासून वंचित राहावे लागले. उर्वरित चार लाख ७३० शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ८० कोटी १४ लाख ६० हजार रुपये जमा केले आहेत.

तालुकानिहाय पीएम किसानचे लाभार्थीतालुका - शेतकरी संख्याआटपाडी - २६,८०९जत - ७०,४२७कडेगाव - ३२,३३५क. महांकाळ - २८,९११खानापूर - २२,७५४मिरज - ५३,३८८पलूस - २२,८७६शिराळा - ३६,६८२तासगाव - ४१,१३१वाळवा - ६५,४१७एकूण - ४,००,७३०

जिल्ह्यात ३,३५२ शेतकरी लाभापासून वंचितजिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी चार लाख ११ हजार ३४३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पण, वारंवार सूचना देऊनही तीन हजार ३५२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही, त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही. याचसोबत ज्या शेतकऱ्यांनी नियमाबाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यातील तीन हजार ३५२ शेतकऱ्यांनी ई-केवायीसी पूर्ण केली नाही. या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागले आहे.

काय आहे शासनाची किसान सन्मान योजना?

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने बनविलेली एक कल्याणकारी योजना आहे.
  • या योजनेंतर्गत २ हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या देशभरातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये याप्रमाणे अनुदान दिले जाते.
  • ही रक्कम वर्षभरात तीन हप्त्यांत म्हणजे चार महिन्यांनी एक हप्ता याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. त्यातील प्रत्येक हप्ता हा २ हजार रुपयांचा असतो.
टॅग्स :SangliसांगलीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीbankबँक