शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

उष्ण हवामानामुळे कुक्कुटपालन धोक्यात

By admin | Published: April 12, 2016 10:46 PM

दुष्काळात तेरावा : ढगाळ वातावरणाचाही फटका; व्यावसायिक चिंतित

खामखेडा : वाढत्या उष्ण व बदलत्या हवामानात पोल्ट्री फार्ममधील पक्षी जगू शकत नसल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. परिणामी पोल्ट्री फॉर्म शेड ओसाड पडत आहेत. वीस वर्षांपूर्वी शेतकरी शेतीला जोडव्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बकरी पाळत. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत. त्याचबरोबर गावठी कोंबड्याही पाळत असत.जसजसा शेतीचा विकास होत गेला तसतसा शेतीपूरक जोडधंद्यांमध्येही बदल होत गेला. दुय्यम दर्जाच्या व्यवसायाची गरज भासू लागल्याने व जोडधंद्यातून पैसा मिळू लागल्याने शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे वळू लागले. खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री शेडमध्ये वाढ झाली आहे. पोल्ट्री बांधकामासाठी जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा जास्त शेड उभारणीसाठी येतो. गावातील सोसायटी, बँका या व्यवसायासाठी कर्जपुरवठा करू लागल्याने अनेक शेतकऱ्यांचे सुशिक्षित मुले नोकरीऐवजी पोल्ट्री व्यवसायाकडे वळले आहेत.कुक्कुट पालनातून चार पैसे हाती येऊ लागल्याने अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळले. चालू वर्षी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. कोंबड्यांसाठी थंड हवामान पोषक असते. उष्ण हवामानामुळे कोंबड्यांचा मृत्यू होतो. उष्ण हवामाना-पासून पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यांवर उसाचे पाचड, बारदान, नारळाच्या झाडाच्या फांद्या इत्यादि टाकून थंडावा निर्माण केला जात आहे. एवढे करूनही या वर्षाचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी पोषक नाही. यामुळे अनेक पोल्ट्री कंपन्यांनी पोल्ट्री शेडमध्ये पिल्ले न टाकल्याने अनेक शेड रिकामे दिसत आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायासाठी सोसायट्या, बँकांकडून घेतलेले कर्ज कसे परत करावे याची चिंता पोल्ट्री व्यावसायिक करीत आहेत. (वार्ताहर)