शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
2
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
3
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
5
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
6
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
7
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
8
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
9
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
10
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार
11
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
12
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
13
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
14
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
15
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
16
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
17
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
18
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
19
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला

राज्यकर्त्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळेच विकासात अडचण

By admin | Published: April 11, 2016 11:12 PM

नानासाहेब पाटील : शहरांच्या मूलभूत सुधारणांकडे लक्ष देण्याची गरज--नेमगोंडा पाटील व्याख्यानमाला

सांगली : शहरांचा विकास व्हावा आणि त्या विकासातून राज्याच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी राज्यकर्त्यांनी भूमिका घेणे आवश्यक आहे. आगामी काही वर्षांचा विचार केला, तर देशाच्या विकासात शहरांचे महत्त्व अधोरेखित होणार असल्याने, राज्यकर्त्यांनी शहरांच्या विकासासाठी योगदान देणे आवश्यक असले तरी, दुर्दैवाने त्यांची भूमिकाच शहरांच्या विकासात अडचण ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी अप्पर मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी सोमवारी केले. नेमगोंडा दादा पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘स्मार्ट सिटी खरोखरच अस्तित्वात येईल काय?’ या विषयावर पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, सुरेश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले की, राज्याचा विचार करता, ५२ टक्के उत्पन्न हे केवळ मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या शहरांतून मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रगत राज्य असणाऱ्या महाराष्ट्रातील शहरांचा विकास व्हावयाचा असेल, तर शहरांतील महानगरपालिका सक्षम झाल्या पाहिजेत. विद्यमान सरकारने जकात हटविण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत यामुळे हटणार आहे. विदेशात कर गोळा करण्यासाठी वेगवेगळे स्रोत वापरण्यात येतात. त्याचा अवलंब करण्यात आला पाहिजे. नागरिकांचा शहरांकडे ओढा वाढत असून, त्यांना सुविधा पुरविण्याची कसरत महापालिकांना करावी लागणार आहे. देशाचे उत्पन्न ४०० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची क्षमता शहरांत असल्याने राज्यकर्त्यांनी मानसिकता बदलत शहरांचा विकास साधला, तर स्मार्ट सिटीची संकल्पना प्रभावी ठरणार आहे. (प्रतिनिधी)