शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

कडेगाव तालुक्यात पूर्ण क्षमतेने व अखंडित वीज द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:33 AM

लोकमत न्यूज नेटवर्क कडेगाव : कडेगाव तालुक्यातील खरीप पिके, ऊस, भाजीपाला-फळभाज्या आणि विविध फळबागा सध्या पाणी देण्याच्या अवस्थेत आहेत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कडेगाव : कडेगाव तालुक्यातील खरीप पिके, ऊस, भाजीपाला-फळभाज्या आणि विविध फळबागा सध्या पाणी देण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र, पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वीजटंचाईने त्रस्त शेतकऱ्यांनी काही ठिकाणी आंदोलनेही केली आहेत. यावर आता तत्काळ उपाययोजना करा आणि आठ तास अखंडित वीजपुरवठा करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना दिल्या.

‘महावितरण’च्या विटा विभागीय कार्यालयात देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट देऊन कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांच्याशी शेतीपंपांच्या वीजप्रश्नी चर्चा केली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष धनंजय देशमुख, संपतराव देशमुख मिल्क युनियनचे संचालक संदेश दंडवते, सुधाकर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी संग्रामसिंह देशमुख म्हणाले राज्य सरकारने शेतीपंपासाठी सलग आठ तासही वीज मिळत नाही. रात्री-बेरात्री उठावे लागत आहे. तांत्रिक अडचणी असल्याचे कारण सांगत वीजपुरवठा खंडित केला जातो. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे. कडेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी रोहित्र कमी क्षमतेचे आहेत. योग्य दाबाने वीज मिळत नाही. विजेच्या लपंडावाने विद्युत पंप जळण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर तत्काळ उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे सांगितले.

यावेळी वसंतराव शिंदे, संभाजी रासकर, प्रकाश गायकवाड, अरुण हावलदार, बबन माळी, सुधाकर शेटे, हणमंत चव्हाण, मनोज माळी, प्रवीण सूर्यवंशी उपस्थित होते.

चौकट :

शेतीपंपाच्या वीजप्रश्नी पालकमंत्र्यांना भेटणार :

कडेगाव तालुक्यात वीज वितरण कंपनीची यंत्रणा सक्षमपणे उभा करण्याची गरज आहे. तालुक्यात वीज उपकेंद्रांची संख्या वाढवण्याची गरज आहे. वीज वितरण कंपनीने तालुक्याचा सर्वसाधारण आराखडा तयार करावा. प्रसंगी आम्ही स्वतः पालकमंत्र्यांना भेटून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी मागणी करणार आहोत, असेही संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले.