शहरं
Join us  
Trending Stories
1
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
2
हरयाणात भाजपची हॅट् ट्रिक की, काँग्रेसचे होणार पुनरागमन? मतदानाला सुरुवात
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सार्वजनिक क्षेत्रातून प्रशंसा, कौटुंबिक व दांपत्य जीवनात सौख्य लाभेल
4
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
5
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
6
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
7
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
8
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
9
राज्यात आज धडाडणार राजकीय तोफा; मोदी वाशिम-ठाण्यात तर राहुल गांधी कोल्हापुरात
10
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
11
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
12
समाज घटकांसाठी महामंडळे; मंत्रिमंडळ बैठकीत जैन, बारी, तेली समाजासाठी महत्त्वाचे निर्णय 
13
पंतप्रधानांच्या डोळ्यात धूळफेक, अपूर्ण योजनेचे उद्घाटन
14
एकीकडे इराण म्हणतोय युद्ध नकोय, दुसरीकडे म्हणतोय इस्रायलवर हल्ले करणारच 
15
मोदींचे ठरले! ९ वर्षांनी पाकच्या दौऱ्यावर जाणार भारताचे परराष्ट्रमंत्री; ‘एससीओ’ परिषदेत हाेणार सहभागी
16
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
17
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
18
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
19
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
20
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   

पुजारवाडी ग्रामपंचायतीचे दिव्यांग निधीबाबत दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 7:19 AM

दिघंची : पुजारवाडी (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीकडून दिव्यांग लोकांना ५ टक्के निधी देण्यात आलेला नाही. तो निधी तत्काळ देण्यात ...

दिघंची : पुजारवाडी (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीकडून दिव्यांग लोकांना ५ टक्के निधी देण्यात आलेला नाही. तो निधी तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी येथील दिव्यांगांमधून हाेत आहे.

गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून दिव्यांग लोक निधीची मागणी ग्रामपंचायतीकडे करत आहेत. परंतु ग्रामपंचायत प्रशासन त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. ग्रामपंचायतकडे निधी शिल्लक असूनही दिव्यांग लोकांना वितरीत करण्यात येत नाही. ग्रामपंचायतीकडे दिव्यांगांनी आपली कागदपत्रे जमा केली आहेत. तरीही त्यांना निधी वितरीत केलेला नाही. त्यामुळे निधी मिळण्यासाठी दिव्यांगांना ग्रामपंचायतीकडे सतत हेलपाटे मारावे लागत आहेत.

२०१६ पासून राज्य सरकारने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील पाच टक्के निधी दिव्यांगांना वाटपाचा अध्यादेश काढला आहे. मात्र या अध्यादेशाची अंमलबजावणी अद्याप पुजारवाडी ग्रामपंचायतीने केलेली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी दिव्यांग बांधवांना मिळणे अपेक्षित होते. पण ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष असल्याने नाराजी व्यक्त हाेत आहे.