शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

Sangli News: म्हैसाळ योजनेच्या पंपांना अवघ्या १५ दिवसांतच विश्रांती, वीजबिलाचा नाहक भुर्दंड सोसावा लागणार

By संतोष भिसे | Published: February 06, 2023 5:21 PM

१७ जानेवारीस जलसंपदा विभागाच्या बैठकीत योजना सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले होते.

सांगली : म्हैसाळ योजनेच्या पंपांना अवघ्या १५ दिवसांतच विश्रांती घ्यावी लागली आहे. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी नसल्याने उपसा थांबविण्यात आला आहे. पंधरा दिवस पंप फिरविल्याने वीजबिलाचा नाहक भुर्दंड कृष्णा खोरे महामंडळाला सोसावा लागणार आहे.१७ जानेवारीस जलसंपदा विभागाच्या बैठकीत योजना सुरु करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले होते. अधिकाऱ्यांनीही पाण्यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी प्राप्त झाल्याचे सांगितले होते. २० जानेवारीरोजी पंप सुरु करण्यात आले. पण अवघे १५ दिवसच सुरु राहिले. ३ फेब्रुवारीस विश्रांती देण्यात आली. या कालावधीत कृष्णेचे पाणी सलगरेत पाचव्या टप्प्यापलीकडेही जाऊ शकले नाही. अधिकाऱ्यांचे नियोजन जतपर्यंत पाणी नेण्याचे होते, पण मिरज तालुक्याची सीमाही ओलांडता आली नाही. पाणी कालव्यातून वाहत राहिले, शेतकऱ्यांनी मात्र उपसा केला नाही. जत तालुक्यातूनही मागणी अर्ज आले नाहीत. प्रशासनाने वेगवेगळ्या ग्रामपंचायतींत मागणी अर्ज घेण्याची सोय केली होती. पण शेतकरी फिरकले नाहीत.सध्या थंडी अद्याप कायम असल्याने विहिरी व कुपनलिकांतील पाणीसाठे टिकून आहेत. ऊसतोड व द्राक्ष उतरण सुरु आहे. त्यामुळे पाण्याची गरज नाही. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.दरम्यान, सलगरे येथे योजनेच्या पाचव्या पंपगृहात विद्युत पॅनलचे काम सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण पॅनल बदलण्यात येणार आहे. थकबाकी ९८ कोटींवर म्हैसाळ योजनेची गेल्या आवर्तनासह एकूण थकीत पाणीपट्टी ९७ कोटी ७४ लाखांवर पोहोचली आहे. शासन निर्णयानुसार पाणीपट्टीपैकी ८१ टक्के हिस्सा शासन भरते, तर फक्त १९ टक्के पैसे शेतकऱ्याने भरायचे आहेत. तरीही पैसे भरण्यासाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. यंदाच्या आवर्तनासाठी जलसंपदा विभागाने २३ हजार ४९४ रुपये प्रतिदशलक्ष घनफूट इतकी पाणीपट्टी निश्चित केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरी