शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

पक्षीय राजकारण बाजूला ठेवा

By admin | Published: July 07, 2017 11:22 PM

पक्षीय राजकारण बाजूला ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘सातारा जिल्ह्याची परंपरा उज्ज्वल असून, त्यात भर टाकण्याचे काम सदस्यांनी करावे. निवडणुकीत कोणत्याही पक्षातून निवडून आला असला तरी सभागृहात आल्यावर पक्षीय राजकारण बाहेर ठेवून कामकाज करावे. विरोधाला विरोध करू नये. सर्वांनी एकत्रित काम केले तर उठावदार होईल,’ असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषद सातारा व यशदा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पदाधिकारी व सर्व परिषद सदस्य तसेच ११ पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, शिक्षण व अर्थ समितीचे सभापती राजेश पवार, कृषी सभापती मनोज पवार, महिला व बालकल्याण समिती सभापती वनिता गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगौड यांच्या उपस्थितीत दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यशाळेस प्रारंभ झाला.संजीवराजे म्हणाले, ‘दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी त्रिस्तरीय व्यवस्था सुरू केली. महाराष्ट्राने ती स्वीकारली. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला. आता काळ बदलला असून, ग्रामपंचायतींना थेट निधी मिळू लागला आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती यांची नेमकी भूमिका काय हा प्रश्न पडू लागला आहे. परंतु या सदस्यांना अधिकार असून, ते जाणून घ्यावेत. डीपीडीसीचा आराखडा जिल्हा परिषदेत मंजूर होत असतो. त्यात रस्ते, लघु पाटबंधारे, आरोग्य केंद्र, शैक्षणिक सुविधाबाबत सदस्यांना अधिकार आहेत. त्यानंतर डीपीडीसी मध्ये जातो तिथेही जिल्हा परिषद सदस्यांची संख्या अधिक असते. त्यामुळे जो अधिकार आहे, तो व्यवस्थितपणे राबवावा, यासाठी ही शिबिर आयोजित केले आहे. म्हणून त्याबाबत चर्चा न करता जे उपलब्ध आहे, त्यात काम करावे.’दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी जिल्हा परिषद सभा शास्त्र याची माहिती उपस्थितांना दिली. त्यानंतर धामणेरचे सरपंच शहाजी क्षीरसागर यांनी निर्मल ग्राम अभियान, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. दुपारच्या सत्रात प्रमुख पाहुणे पोपटराव पवार म्हणाले, ग्रामीण भागाचा विकास व्हायचा असेल तर जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे अस्तित्व राहिले पाहिजे. या दोन्ही संस्थांना सक्षम करण्यासाठी देशपातळीवर एक बैठक झाली असून त्यात शिफारस करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.