शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारचं कामगारांना मोठं गिफ्ट! महिन्याला मिळतील ₹26000, कसं ते समजून घ्या
2
एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! एक कुटुंब दत्तक घ्यावे लागणार
3
डझनभर वंदे भारत ट्रेन ठरतायत पांढरा हत्ती; निम्म्या जागाही भरताना मुश्कील, महाराष्ट्रातील एक...
4
१५०० घरांची झडती, १०० पोलीस, प्लास्टिक कंटेनर...; ५ वर्षांच्या मुलीसोबत थरकाप उडवणारं कृत्य
5
"...नाहीतर अदानींकडून काॅन्ट्रॅक्ट काढून घेऊ", फडणवीसांचं धारावी प्रकल्पाबद्दल मोठं विधान
6
IND vs BAN, 2nd Test : जबरदस्त कॅच! पुन्हा पुन्हा रिप्लाय अन् जैस्वालचा प्रयत्न ठरला 'यशस्वी' (VIDEO)
7
"मी सिनेमा काढणार", संजय राऊतांनी नावही केले जाहीर; काय बोलले?
8
Vedanta Group : भंगार विकता विकता उभा केला कोट्यवधींचा व्यवसाय; पाहा Vedanta ची सुरूवात कशी झाली?
9
शेख हसिनांच्या विरोधात कोणी कारस्थान रचले? युनूसनी अमेरिकेत भर मंचावर नाव सांगितले
10
Exclusive: प्रिया बापटची Bigg Boss वर प्रतिक्रिया, म्हणाली, "तीनच लोक खरे वाटतात ते म्हणजे..."
11
स्टंटबाजीमुळे कालव्यात पडली कार; पोलिसांची मोठी कारवाई, ५ तरुणांची जेलमध्ये रवानगी
12
"अरबाजचा साखरपुडा झालाय वाटतं", आईचा मोठा गौप्यस्फोट ऐकून हादरली निक्की! अरबाजचे कपडे घेतले अन्...
13
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
14
IPL 2025 : शाहरुखच्या KKR नं खेळला मोठा डाव; MS धोनीच्या सहकाऱ्यानं घेतली गौतम गंभीरची जागा
15
'आदिपुरुष'मधील रावणाच्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलला सैफ, म्हणतो- "आपण धर्मापासून लांबच..."
16
आता शेअर विकल्यास केवळ द्यावे लागणार ३.५ रुपये; कोट्यवधी गुंतवणूकदारांना फायदा; काय आहे नवा नियम?
17
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
18
Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम
19
India vs Bangladesh, 2nd Test : रोहितनं टॉस जिंकला, 'नो चेंज' म्हणत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय
20
आधी पॅरिस, आता अबू धाबी; ऐश्वर्यासोबत लेकीची परदेशवारी; नेटकरी म्हणतात, 'शाळा नाही...'

धनगरवाडा, विनोबाग्राम येथील जमिनींची तातडीने मोजणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:30 AM

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : वनविभागाने धनगरवाडा व विनोबाग्राममधील जमिनी येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा

: वनविभागाने धनगरवाडा व विनोबाग्राममधील जमिनी येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे या जमिनी कशा नोंद झाल्या, याबाबत पंधरा दिवसांत योग्य कागदपत्रे दाखवावीत. सध्या असणाऱ्या या जमिनींची तातडीने मोजणी करावी, असा आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.

तहसील कार्यालयात धनगरवाडा व विनोबाग्राम येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते.

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, युवा नेते विराज नाईक, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालक समाधान चव्हाण, उपवनसंरक्षक विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, जमिनी दिल्याचे शेतकऱ्यांकडे पुरावे आहेत, मात्र या जमिनी पुन्हा वनविभागाने परत घेतल्या याचे पुरावे नाहीत. शेतकऱ्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा तलाठी मंडळींनी घेतला तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. येथील नागरिकांनी मोजणीसाठी पैसे भरले आहेत. ती तातडीने मोजणी करा. तीन पिढ्या या जमिनी हे शेतकरी कसत आहेत. त्यांनी अतिक्रमण केलेल्या जमिनी हे शेतकरी मागत नाहीत तर हक्काच्या जमिनी मागत आहेत. वनविभागाने मन मोठे करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.

आमदार मानसिंगराव नाईक यांनी यावेळी कोणत्या आधारे जमिनी वनविभागाच्या नावे झाल्या ते दाखवा असे विचारून या चुका अशिक्षित नागरिकांच्या आहेत काय , या सर्व जमिनी शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. शेती करतात त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिलाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली.

सरपंच वसंत पाटील, बाबूराव डोईफोडे यांनी, १५० वर्षे झाली आमच्या तीन पिढ्या संपल्या आहेत. आतातरी आम्हाला न्याय द्या. या जमिनी वनविभागाच्या नावे असल्याने शेती विकसित करणे, घर बांधणे, शेती कर्ज या शासकीय योजनांचा लाभ घेता येत नाही. तसेच वन्यप्राण्यांनी शेतीचे नुकसान केल्यास नुकसानभरपाई मिळत नाही, असेही सांगितले.

चौकट

आमदारांनी घेतले वन अधिकाऱ्यांना फैलावर

आमदार नाईक यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या जमिनी कोण कसतो ते सांगा असे विचारले असता, अधिकाऱ्यांनी वनविभागाकडे जमिनी असल्याचे खोटे उत्तर दिले. आ. नाईक यांनी या बैठकीतूनच पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासह त्या गावाला भेट देऊ या का, मग कळेल सत्य काय ते, असा जाब विचारला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने मान खाली घालून शब्द माघारी घेतले.