शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आता ‘आर या पार ची’ लढाई

By admin | Published: February 14, 2016 12:45 AM

किसन गुजर : महामुक्काम मोर्चाचे आयोजन

सांगली : राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असताना, सरकार मात्र त्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या दुर्लक्षामुळे राज्यात तीन हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांचा विकास केंद्रबिंदू मानून काम करण्याऐवजी उद्योजकांना पायघड्या पसरणाऱ्या सरकारला जाग आणण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आता ‘आर या पार’ची लढाई उभारणार असल्याचा इशारा किसान सभेचे राज्य सरचिटणीस किसन गुजर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. किसान सभेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा अधिवेशनाच्या निमित्ताने गुजर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी अधिवेशनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गुजर पुढे म्हणाले की, शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस घसरत असताना शेतीतील उत्पादन खर्च मात्र वाढत आहे. त्याचबरोबर शेतकरी कसत असलेल्या देवस्थान जमिनी, इनाम जमिनी, गायरान जमिनी व वन जमिनी अजूनही सरकारच्या नावावर आहेत. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीटसारख्या नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी हैराण झाले असताना, सरकार मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी २९ मार्चला नाशिक येथे महामुक्काम मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातून या आंदोलनात लाखाहून अधिक शेतकरी सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ. अजित नवले, दिगंबर कांबळे, गुलाब मुलाणी, विजय गुरव, दिलीप शुक्ला, जयकुमार सकळे, मस्जीद शिरोळकर, बाळासाहेब गुरव, जावेद मुजावर, गवस शिरोळकर आदींची कार्यकारिणी निवडण्यात आली. (प्रतिनिधी)