शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
2
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
3
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
4
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण
5
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
6
आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?
7
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!
8
सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; रिलायन्सच्या तेजीमुळे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर; या सेक्टरचे भाव वधारले
9
सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
10
"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...
11
"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
12
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story
14
IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!
15
बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच
16
रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल 
17
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
18
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
19
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
20
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा

..तरच शेतकरी वाचणार; केंद्र, राज्य सरकारवर रघुनाथदादा पाटील यांचे टीकास्त्र

By अशोक डोंबाळे | Published: August 04, 2023 7:03 PM

इस्लामपुरात ९ ऑगस्टला चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा

सांगली : ऊस, दूध आणि शेतमालाच्या भावात पिळवणूक होत असल्याने शेतकऱ्यांपुढील आर्थिक संकट वाढले आहे. ‘इंडिया’विरुद्ध ‘भारत’ ही लढाई मागील ७० वर्षांपासून सुरू असली तरी त्यामध्ये शेतकऱ्यांचा पराभव झाला आहे. आता केंद्र आणि राज्यातील सरकार हाकलले तरच शेतकरी वाचतील, अशी टीका शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. इस्लामपूर येथे दि. ९ ऑगस्ट रोजी शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी आपकी बार किसान सरकार आणण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केल्याचेही त्यांनी सांगितले.पाटील म्हणाले, २०१३ मध्ये तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर इतर राज्यांप्रमाणे तेलंगणा राज्यातही शेतकरी आत्महत्या सुरू होत्या. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून के. चंद्रशेखर राव यांनी धोरण राबवायला सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी शेतीला पाणी, मोफत वीज देण्याचा धाडसी निर्णय घेतला. खरीप आणि रब्बी हंगामात पेरणीपूर्व एकरी १० हजार रुपये थेट रोख मदत शेतकऱ्यांना केली. नैसर्गिक मृत्यू झाल्यास एकरकमी पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले. परिणामी, तेलंगणा राज्यावरील शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसला गेला. मराठवाड्याचे माजी महसूल आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केलेल्या अहवालात सुमारे एक लाख शेतकरी आत्महत्येच्या विचाराने ग्रासले असल्याचे नमूद केले. त्यांनी तेलंगणा सरकारप्रमाणे एकरी १० हजार रुपये मदत करण्याची शिंदे-फडणवीस सरकारला शिफारस केली. मात्र, सरकारने ही शिफारस धुडकावून लावली आहे. शेतकरी विरोधी काम करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारला आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे.

मागील ७५ वर्षांत आमदार, खासदारांनी राबविलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशाला शेतकरी आत्महत्यांचा कलंक लागला आहे. त्याला समर्थन देण्यासाठी इस्लामपुरात ९ ऑगस्ट रोजी चंद्रशेखर राव यांचा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. यावेळी बी. जी. पाटील, महिला संघटनेच्या वंदना माळी, शर्वरी पवार उपस्थित होत्या.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार