शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
4
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
5
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
6
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
7
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
8
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
9
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
10
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
11
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
12
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
13
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
14
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
16
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
17
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
18
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
19
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
20
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला

सुदानमध्ये अडकलेले सांगलीकर अखेर मायदेशी, मुंबई विमानतळावर स्वागत; कुटूंबियांचा सुटकेचा निश्वास

By शरद जाधव | Published: May 03, 2023 4:31 PM

सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत ३५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परतली.

सांगली : आफिक्रा खंडातील सुदान देशामध्ये सुरू असलेल्या गृहयुध्दामुळे अडकलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकांची अखेर सुटका झाली आहे. बुधवारी सकाळी सुदानहून विशेष विमानाने या नागरिकांचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील १०० ते १२० हून अधिकजण सुदानमध्ये अडकले होते. आठवडाभराच्या प्रयत्नानंतर हे मायदेशी येत आहेत. सुदानमध्ये लष्कर व निमलष्करी दलात निर्माण झालेल्या संघर्षातून गृहयुध्द सुरू झाले आहे. युध्द सुरू झाल्यापासून सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुखरूपणे भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. सांगली जिल्ह्यातील १०० ते १२० जण रबाका शहराजवळ असलेल्या केनाना शुगर फॅक्टरीमध्ये कामास होते. हा परिसर पूर्णपणे सुरक्षित असलातरी युध्द भडकण्याची चिन्हे असल्याने या कारखान्यातील कामगारांनी परत भारतात नेण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने प्रयत्न चालविले होते. सरकारच्या ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत ३५ नागरिकांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेच्या विमानाने पोर्ट सुदान ते जेधाह (सौदी अरेबिया) व जेधाह ते मुंबई असा प्रवास करून भारतात परतली. यात सांगली जिल्ह्यातील सात नागरिकांचा समावेश आहे.

टॅग्स :Sangliसांगली