शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

नरवाडच्या ग्रामस्थांची पंचायत समितीवर धडक

By admin | Published: February 29, 2016 11:27 PM

अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा : योजना रखडल्याने पाणीप्रश्न गंभीर

मिरज : नरवाड (ता. मिरज) येथील पाणीपुरवठा करण्यासाठी मंजूर झालेली राष्ट्रीय पेयजल योजना अधिकारी व ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे रखडल्याने पिण्याचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. पाणीप्रश्नाने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांनी सोमवारी मिरज पंचायत समितीवर धडक मारली व तातडीने पाणीप्रश्न न सोडविल्यास आंदोलनाचा इशारा दिला. नरवाडसह वाड्या-वस्तीवरील पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी २ कोटी ५ लाख रूपये खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर आहे. दीड वर्षात पूर्ण होणारी ही योजना सात वर्षापासून रखडली आहे. निधीतील १ कोटी ७० लाख रूपये ठेकेदाराने उचलले आहेत. केलेले काम वादात सापडले आहे. वेळोवेळी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी हात आखडता घेतला आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश असलेल्या नरवाडसह गायरानवाडी, बाराकोठडी, लक्ष्मीनगर भागातील ग्रामस्थांना योजना अपूर्ण असल्याने पाण्याच्या एका घोटासाठी मैलोन् मैल भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी विकतचे पाणी घेऊन तहान भागविण्याची वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. प्रशासनही ग्रामस्थांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने, पाणीप्रश्नाने त्रस्त असलेल्या बारकोठडी परिसरातील ग्रामस्थांनी पाणीप्रश्नासाठी सोमवारी मिरज पंचायत समितीवर धडक मारली. तातडीने पाणीप्रश्न न सोडविल्यास आंदोलन करावे लागेल, असा इशारा पंचायत समिती सदस्य बाबासाहेब कांबळे, अरुण कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना दिला. गावासाठी कोट्यवधीची पाणी योजना मंजूर आहे. अशात या गावाची आणेवारीही ५० पैशापेक्षा अधिक असल्याने, पर्यायी व्यवस्था करण्यातही प्रशासनासमोर अडचणी आहेत. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणीनरवाड येथील राष्ट्रीय पेयजल योजना पूर्ण केल्याशिवाय पिण्याचा पाणीप्रश्न सुटणे शक्य नाही. गेल्या सात वर्षात पाणी योजना पूर्ण होण्यासाठी पंचायत समितीच्या सभेत बाबासाहेब कांबळे पाठपुरावा करीत आहेत. ठेकेदारांवर कारवाईच्या नोटिसा बाजाविल्या जातात, पण कारवाई होत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांची ठेकेदारावर कारवाई करण्याची मानसिकता नसल्याने, योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. ग्रामस्थांचे सुरू असलेले हाल लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनीच दखल घेऊन रखडलेल्या पाणी योजनेचा पर्दाफाश करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.