शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

मिरजेत संघर्ष समितीचा पुन्हा प्रयोग

By admin | Published: June 04, 2017 11:32 PM

मिरजेत संघर्ष समितीचा पुन्हा प्रयोग

सदानंद औंधे । लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिरजेत संघर्ष समितीच्या प्रयोगाची पुन्हा एकदा तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसचे आठ, राष्ट्रवादीचे पाच, भाजपचा एक असे १४ सदस्य संघर्ष समितीत जाणार असल्याने मिरजेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना संघर्ष समिती आव्हान देणार आहे.महापालिकेच्या स्थापनेपासून मिरजेतील नगरसेवकांचा सत्ताधाऱ्यांशी सवतासुभा आहे. पदे मिळविण्यासाठी सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या मिरजेतील नगरसेवकांनी प्रभाग समिती चारमध्ये मात्र सत्ताधाऱ्यांना नामोहरम केले आहे. गेल्या वीस वर्षांत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना प्रभाग समिती चारमधील मिरज पॅटर्न गट मोडीत काढता आलेला नाही. गत निवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यांनी मैदानाबाहेर काढलेल्या माजी महापौर इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष समिती मिरजेतील २२ पैकी १४ सदस्य दाखल झाले आहेत. महापालिका निवडणुका वर्षावर येऊन ठेपल्यानंतर मिरजेतील नगरसेवकांचा मोठा गट भाजपमध्ये जाणार असल्याची मोठी चर्चा सुरू झाली होती; मात्र भाजपशी बोलणी फिसकटल्यानंतर संघर्ष समितीतर्फे निवडणूक लढवून सत्तेत सहभाग मिळविण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. यापूर्वीही इद्रिस नायकवडी यांच्या संघर्ष समितीने चार ते पाच सदस्यांच्या बळावर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपद मिळविले होते. मिरजेत नायकवडी विरुध्द जामदार यांच्यात नेहमीच राजकीय संघर्ष आहे. जामदार गट सत्तेत असल्याने नायकवडी गटाची विरोधी भूमिका आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संघर्ष समितीने महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेसलाही अनेकवेळा धक्के दिले आहेत. महापालिका निवडणुकीत संघर्ष समितीतर्फे मिरजेतील २२ पैकी १४ नगरसेवक निवडणूक लढवून काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपला आव्हान देणार आहेत. काँग्रेसचे नऊ, राष्ट्रवादीचे पाच, भाजपचा एक असे १४ सदस्य संघर्ष समितीत जाणार असल्याने मिरजेतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी तक्रार करून इद्रिस नायकवडी यांना मैदानाबाहेर काढले होते. मात्र यावेळी इद्रिस नायकवडी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन सदस्य संघर्ष समितीतर्फे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. संघर्ष समितीच्या बैठकीस माजी महापौर विवेक कांबळे, मैनुद्दीन बागवान, सुरेश आवटी, अल्लाउद्दीन काझी, शुभांगी देवमाने, मालन हुलवान, शिवाजी दुर्वे, जरीना बागवान उपस्थित होते. मिरजेतील आणखी काही सदस्य व सांगलीतील चार सदस्य संपर्कात असल्याचा समितीचा दावा आहे. सत्तेसाठी एकत्र येण्याबाबत ख्याती असलेली मिरजेतील महत्त्वाकांक्षी असलेली नेतेमंडळी आता पुन्हा एकत्र आली आहेत. मात्र सत्तेचे गणित जमले नाही, तर ही मंडळी किती दिवस एकत्रित राहणार, याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. मात्र प्रस्थापित नगरसेवक व त्यांच्या प्रभागात असलेल्या प्रभावामुळे संघर्ष समितीच्या आव्हानाचा सर्वच राजकीय पक्षांना सामना करावा लागणार आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला चापमाजी महापौर इद्रिस नायकवडी म्हणाले, सर्व पक्षांच्या नेतेमंडळींकडून नागरिकांचा व सदस्यांचाही भ्रमनिरास झाला आहे. यामुळे महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी व नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, यासाठी संघर्ष समितीच्या झेंड्याखाली सांगली-मिरजेतील अनेक नगरसेवक एकत्र आले आहेत. केवळ सत्ता मिळविणे हे आमचे ध्येय नसून, संघर्ष समितीच्या सदस्यांमुळे महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला चाप लागणार आहे.