शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

गरजेइतके पाणी मिळाल्याने ताकारी योजना पूर्ववत

By admin | Published: April 19, 2016 11:51 PM

अडविलेले पाणी सोडले : टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांकडून योजनेच्या प्रश्नाबाबत उडवाउडवीची उत्तरे--लोकमतचा दणका

कडेगाव : ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यात गरजेइतकी पाणी पातळी मिळाल्याने मंगळवारी ही योजना पूर्ववत सुरू झाली. टेंभू योजनेच्या टेंभू (ता. कऱ्हाड) येथील बंधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यातील पाणीपातळी खालावली होती. त्यामुळे ताकारी योजना बंद पडली होती. याबाबत टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु टेंभूच्या बंधाऱ्यातून पुढे पाणी सोडले. त्यामुळे सकाळी योजनेचे दहा पंप सुरू झाले.टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे तसेच बेजबाबदार कामामुळे सलग तीन आवर्तनात ही ताकारी योजना बंद पडली. सांगली पाटबंधारे विभागाकडे ताकारी, टेंभू योजनेसह नदीवरील सिंचन व्यवस्थापनाची सर्वस्वी जबाबदारी आहे. या विभागाचे कार्यकारी अभियंता ना. नु. सूर्यवंशी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनांप्रमाणे ताकारी तसेच टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करणे अपेक्षित असताना, टेंभू योजनेचे संबंधित अधिकारी बेजबाबदारपणे काम करीत गरजेपेक्षा जादा पाणी अडवून ठेवतात. त्यामुळे ताकारी योजना तीनवेळा बंद पडली. याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिध्द केले आणि टेंभूचे अधिकारी खडबडून जागे झाले. अडवून ठेवलेले पाणी पुढे सोडले. त्यामुळे ताकारी योजनेसाठी आवश्यक असणारी ५४० ते ५४१ मीटर इतकी पाणी पातळी मिळाली. त्यानंतर ताकारी योजनेचे १० पंप मंगळवारी सकाळी सुरू झाले. ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होऊ महिना झाला होता. योजनेचे पाणी १०० किलोमीटरवर तासगाव तालुक्यात विसापूरजवळ गेले होते. आता कोरडा पडलेला मुख्य कालवा भरून १०० किलोमीटरपर्यंत पाणी जाण्यास दोन दिवस लागतील. या दोन दिवसातील पाण्याचा अपव्यय अणि वीज बिलाचा भुर्दंड ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. (वार्ताहर)६० लाखाचा भुर्दंडटेंभू बंधाऱ्यात पाणी अडविल्यामुळे ताकारी योजना बंद, असे प्रकार आजपर्यंत तीनवेळा घडले. बंद झालेली योजना सुरू करून पुन्हा पाणी तासगाव तालुक्यात पोहोचण्यासाठी दोन दिवस लागतात. या दोन दिवसात अंदाजे २० लाख रुपये वीज बिल येते. अशाप्रकारे तीनवेळा ताकारी योजना बंद झाली. याचा ६० लाख रूपये भुर्दंड ताकारी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनेचा झटका शेतकऱ्यांना बसत आहे.चौकशी गरजेचीटेंभू बंधाऱ्यात पाणी अडवल्यामुळे ताकारी योजना बंद पडल्याबाबतचे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रसिध्द केल्यामुळे संबंधित अधिकारी खडबडून जागे झाले आणि अडवलेले पाणी सोडले. कोयनेतून पाणी कमी सोडल्यामुळे टेंभू बंधाऱ्यात पाणी अडवले होते, अशी उडवाउडवीची उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. परंतु प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय होती, याची चौकशी होणे गरजेचे आहे.