शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

नरेंद्र मोदींवर ‘आरएसएस’चा कंट्रोल

By admin | Published: January 18, 2016 12:08 AM

कुमार सप्तर्षी : देश वाचवायचा असेल, तर नव्याने राजकीय सुरुवात करण्याची गरज

इस्लामपूर : लोकांनी नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून मते दिली, ते पंतप्रधान झाले़ मात्र त्यांच्यावर ‘आरएसएस’चा कंट्रोल आहे़ सध्या लोकांना संमोहित करून पुरोगामी विचारांच्या लोकांचे मुडदे पाडले जात आहेत, हे सर्वच राजकीय पक्षांना मोठे आव्हान आहे. हा देश वाचवायचा असेल, तर सर्वांनाच नव्याने राजकीय सुरुवात करावी लागेल, असा इशारा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ़ कुमार सप्तर्षी यांनी दिला़ राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते ‘माझे आठवणीतील बापू’ या विषयावर बोलत होते़ याप्रसंगी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, जि़ प़ अध्यक्षा श्रीमती रेश्माक्का होर्तीकर, विश्वासराव पाटील उपस्थित होते.स्वातंत्र्यानंतर ६८ वर्षांनी गोमांस, गोहत्या यासारखे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना लोकशाही हवी का वेदशाही हवी? असा सवाल करीत, योगासने करून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व कमी केले जात आहे, असा आरोप सप्तर्षी यांनी केला़ ते म्हणाले, ज्ञानेश्वर माऊलींनी मधल्या दलालांना बाजूला करून थेट विठ्ठलाशी नाते जोडणारी अध्यात्म क्रांती केली़ त्यातून सर्व जातीत संत तयार झाले. आपण ‘राजकीय लाभार्थी’ होऊ नका़ आपले जीवन ‘हंगामी’ आहे, याची सदैव जाणीव ठेवा आणि जेवढ्या गरजा, तेवढेच मिळवा़ मोदींच्या ‘कॉँग्रेसमुक्त भारत’ या घोषणेचा समाचार घेताना ‘महात्मा गांधींनी घालून दिलेला विचार, संस्कृती कशी जाईल? आणि ती गेली तर देश म्हणून आपण एकत्र राहू का? असा सवाल त्यांनी केला़ राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले़ उपाध्यक्ष विजयबापू पाटील यांनी आभार मानले. विश्वनाथ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले़ पपाली कचरे, प्रा. शामराव पाटील, आबासाहेब देशमुख, विनायक पाटील, विष्णुपंत शिंदे, बी. एस़ पाटील, आनंदराव पाटील, नेताजीराव पाटील, मनोज शिंदे, बी. डी़ पवार, बाबासाहेब मुळीक, किसन जानकर, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, भगवान पाटील, शहाजी पाटील, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, सदाशिव पवार, माणिकदादा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)साधेपणा भावला...बापूंच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा साधेपणा मला भावला़ त्यांनी आयुष्यभर ‘सामान्य माणसा’चे जीवन सुखी करण्यासाठी अपार कष्ट घेतले, या शब्दात सप्तर्षींनी राजारामबापूंना आदरांजली अर्पण केली.