शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
2
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
3
"इस्लाम पर इल्जाम लगा रही हो, माफी मांगो...!"; पश्तून तरुणीच्या प्रश्नावर झाकीर नाईक भडकला
4
धक्कादायक! ६ वर्षे शिक्षिका शाळेत गेलीच नाही, तरीही मिळत होता महिन्याला पगार, कारण...
5
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंत आजची सोन्याची किंमत
6
"वर्ल्ड कपची ट्रॉफी आली लवकरच ती पर्मनंट ट्रॉफी येणार...", कठीण प्रश्नावर 'सूर्या'ची जोरदार 'बॅटिंग'
7
दत्ता भरणेंविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! इंदापुरात जयंत पाटलांनी केली घोषणा
8
BSNL कडून ग्राहकांना मोठा दिलासा; स्पॅम कॉल्स टाळण्यासाठी नवीन फीचर लाँच 
9
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
10
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
11
नवरात्रात लक्ष्मी नारायण योग: ९ राशींना अनुकूल, अचानक धनलाभ; अनेकविध शुभ फले, पण...
12
Amit Shah : २०२६ पर्यंत देश नक्षलमुक्त होईल, लढाई अंतिम टप्प्यात - अमित शाह 
13
CPL 2024 : प्रीती झिंटाची तब्बल १६ वर्षांची प्रतीक्षा संपली; अखेर अभिनेत्रीच्या संघानं जिंकली ट्रॉफी
14
रणवीर सिंगने 'सिंघम अगेन'ला म्हटलं लेकीचा डेब्यू फिल्म, म्हणाला - "बेबी सिंबा..."
15
तेजस्वी यादवांनी शासकीय निवासस्थानातील बेड, बेसिन, एसी पळवले, भाजपाच्या आरोपांनंतर बिहारमध्ये खळबळ  
16
SBI चा एक निर्णय आणि MTNL चा शेअर धडाम.., लागलं लोअर सर्किट; पाहा कारण
17
IND vs BAN: मयंक यादव ठरला T20 पदार्पणात मेडन ओव्हर टाकणारा पाचवा भारतीय; आधीचे ४ कोण? जाणून घ्या
18
हर्षवर्धन पाटलांना जयंत पाटलांनी लोकसभेआधीच दिली होती ऑफर; इंदापुरात केला गौप्यस्फोट
19
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
20
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?

सदाभाऊ खोत यांच्या भूमिकेने ‘स्वाभिमानी’ अस्वस्थ

By admin | Published: March 09, 2016 12:58 AM

नवा राजकीय रंग : राष्ट्रवादी नेत्यांना जवळ करून भाजपवर दबावतंत्राचे राजकारण

अशोक पाटील -इस्लामपूर --गेल्या काही महिन्यांपासून भाजप कोअर कमिटीकडून घटकपक्षांना मंत्रीपद देण्याचे फक्त आश्वासनच मिळत आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. यावर एकच रामबाण उपाय म्हणून, पुणे येथील एका कार्यक्रमात अजित पवार यांच्या जवळ बसून खोत यांनी सत्ताधारी भाजपला चपराक दिली आहे. यामागे मंत्रिपदासाठी भाजपवर दबाव आणण्याची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून आहे, मात्र सदाभाऊंच्या या भूमिकेवर स्वाभिमानी पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आह. लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना केंद्रात कृषिमंत्री होण्याचे स्वप्न पडले होते, तर माढा लोकसभा मतदार संघात चुरशीने निवडणूक लढविलेल्या सदाभाऊ खोत यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळणार, या चर्चेला उधाण आले होते. पण या दोघांच्याही स्वप्नाचा भाजपने चुराडा केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोत यांना मंत्रीपद देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे स्वाभिमानी संघटनेतील कार्यकर्ते सांगत आहेत. परंतु याला मुहूर्तच सापडलेला नाही. त्यामुळे स्वाभिमानीच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यामुळे दोन वर्षात शांत राहिलेल्या या संघटनेला आता पुन्हा शेतकऱ्यांचा कळवळा येत आहे. या त्यांच्या कळवळ्याची दखल त्यांच्याच तालुक्यात असलेले आमदार जयंत पाटील यांनी घेतली नाही. त्यामुळे इस्लामपूर मतदारसंघात स्वाभिमानीचा आलेख खालावला आहे.एकंदरीत ऊस उत्पादकांच्या ताकदीवर मोठे झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महाआघाडीतील पक्षांबरोबर असताना, पुणे येथील कार्यक्रमात राष्ट्रवादीचे माजी मंत्री अजितदादा पवार यांच्या जवळ बसलेल्या सदाभाऊ खोत यांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली असून, त्यांनी तात्काळ मुंबई येथे घटकपक्षांची बैठक बोलावल्याचे समजते. यावरूनच स्वाभिमानीने राष्ट्रवादीच्या वळचणीला जाऊन भाजपवर दबाव आणल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून आहे. एकीकडे दबावतंत्राचे हे राजकारण रंगले असताना स्वाभिमानी पक्षात या नव्या भूमिकेमुळे अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे. शेतकरी चळवळीतून मोठे झालेले सदाभाऊ खोत हे साखरसम्राटांना विकले गेले आहेत. ते बनावट शेतकरी नेते आहेत. सत्ता, संपत्तीच्या लालसेपोटी शेतकऱ्यांचा कसा विश्वासघात करावा, हे त्यांच्याकडून शिकावे. पुणे येथील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमास उपस्थित राहून भाजपवर दबाव आणण्याची खेळी खोत यांनी केली आहे.बी. जी. पाटील, संस्थापक, बळिराजा शेतकरी संघटना.स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत आणि भाजपचे शिवाजीराव नाईक यांना मंत्रीपद मिळू नये म्हणून जयंत पाटील आणि संजय पाटील यांची खेळी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादीच्याच वरिष्ठ नेत्यांना हाताशी धरून सदाभाऊ तसेच घटक पक्षांनी केलेली दबावाची खेळी राजकारणात चर्चेचा विषय बनली आहे.