शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

मंत्री जयंत पाटलांनी ३२ वर्षांनी दिला नारायणकाकांच्या घरास न्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 4:22 PM

वादळी नेतृत्व दिवंगत नारायणकाकांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील संदीप पाटील यांना इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद दिले.

इस्लामपूर : दक्षिण महाराष्ट्रात पुणे-बंगलोर महामार्गावर पेठनाका म्हणजे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू मानला जातो. याच मातीत राजारामबापू पाटील यांच्या राजकीय तालमीत तयार झालेले वादळी नेतृत्व दिवंगत नारायणकाकांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीतील संदीप पाटील यांना इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद मिळाले आहे. पाटील यांना ही संधी देऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी या घराण्याला ३२ वर्षांनी न्याय दिला आहे.१९७० ते १९८० च्या दशकात राजारामबापू पाटील यांच्या राजकीय सहवासात वाळवा तालुक्यातील पेठ (पेठनाका) येथील नारायणकाका पाटील आक्रमक राजकीय नेतृत्व होते. त्यांच्याच घराण्याला १९४० पासून राजकीय वारसा आहे. पेठ ग्रामपंचायतीवर दिवंगत तुकाराम पाटील, दिवंगत नारायणकाका व त्यानंतर संपतराव पाटील यांनी सरपंचपद भूषवले होते. नारायणकाका पाटील यांनी वाळवा पंचायतीचे सभापतीपदही भूषवले.नारायणकाकांचे पुत्र संपत पाटील यांनी गटा-तटाच्या राजकारणाला बगल देऊन १० वर्षे वाळवा पंचायत समितीचे सदस्यपद भूषवत तालुका पातळीवर नेतृत्व उभे करण्याचा त्यांचा डाव फसला. १९९० च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार विलासराव शिंदे आणि जयंत पाटील यांच्या अटीतटीच्या लढतीत संपत आणि प्रकाश पाटील या दोन बंधूंची भूमिका जयंत पाटील यांना खटकली असावी म्हणून राजकारणात या घराण्यातील दुसरी पिढी मागे पडली.त्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात विलासराव शिंदे आणि जयंत पाटील एकत्र असले तरी इस्लामपूर मतदारसंघात वेगवेगळे गट आजही कार्यरत आहेत. त्यामुळेच जयंत पाटील यांनी इस्लामपूर बाजार समितीत विलासराव शिंदे गटाला सभापतीपद देऊन झुकते माप दिले आहे.

शिंदे गटाला संधीआजवर आनंदराव पाटील (साखराळे), विश्वासराव पाटील (कणेगाव), अल्लाउद्दिन चौगले (बागणी), संदीप पाटील (पेठ) या सभापती पदाच्या निवडीचा विचार करता, हे सभापती विलासराव शिंदे गटाचे असल्याचे मानले जाते.   पेठची खासियत

पेठमधील रहिवासी व सातारामधील शासकीय कार्यालयात वरिष्ठ अधिकारी, कायदेतज्ज्ञ व्ही. एन. पाटील, नारायणकाकांचे बंधू कायदेतज्ज्ञ वसंतराव पाटील (सांगली) यांनी सामान्य जनतेला न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे, या लोकांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटील