शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
2
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
3
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
4
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
5
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
6
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
7
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
8
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
9
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
10
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
11
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
12
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
13
‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध
14
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
15
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
16
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
17
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली
18
“ब्रिजभूषण सिंहचा एन्काउंटर का केला नाही, RSSच्या लोकांना वाचवायला अक्षय शिंदेला संपवले”
19
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
20
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सांगली जिल्ह्याला अतिवृष्टी नुकसानीचे मिळाले 'इतके' कोटी, सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर शेतकऱ्यांना दिलासा

By अशोक डोंबाळे | Published: April 19, 2023 7:19 PM

४५ हजार ८६८ शेतकर्‍यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

सांगली : जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे द्राक्ष, डाळींबांसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले होते. ४५ हजार ८६८ शेतकर्‍यांचे २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. पिकांच्या पंचनाम्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला होता. जिल्ह्यातील ४१ हजार ८१५ शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर ४६ कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली आहे.जिल्ह्यातील ५१ शेतकर्‍यांच्या दुबार नुकसानीची नोंद असल्याने भरपाई राखून ठेवली आहे. गेल्या सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पिकांची नुकसानभरपाई मिळाल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला.जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली होती. वादळी वार्‍यासह तुफान पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाले होते, त्यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी, तूर, भुईमूग, उडीद, मूग, सूर्यफूल, बाजरी, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा समावेश होता.प्रशासनाने दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी अतिवृष्टी, अतिपावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचा अहवाल अंतिम केला होता. यामध्ये शिराळा तालुक्यातील एकाही शेतकर्‍याचे नुकसान झाले नव्हते. उर्वरित नऊ तालुक्यांतील ४५ हजार ८६८ शेतकर्‍यांच्या २१ हजार ८८७.३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने ४७ कोटी २५ लाख १५ हजार रुपये निधीची मागणी शासनाकडे केली होती.जिल्ह्यात सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यात जिल्हयात नुकसान झालेल्या ४१ हजार ८१५ शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईपोटी ४६ कोटी रुपयांची रक्कम बँक खात्यावर वर्ग केली आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी