शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

सांगली जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीतही ५९ कोटी रुपयांचा महसूल जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 23:32 IST

सांगली : शासनाने चालू आर्थिक वर्षाकरिता दिलेल्या उद्दिष्टापैकी ८४.४१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. दुष्काळी परिस्थिती व वाळू उपसा ...

ठळक मुद्देउद्दिष्टपूर्तीचा प्रयत्न : सर्वाधिक वसुली गौणखनिजमधून

सांगली : शासनाने चालू आर्थिक वर्षाकरिता दिलेल्या उद्दिष्टापैकी ८४.४१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. दुष्काळी परिस्थिती व वाळू उपसा बंदीच्या काळातही जिल्हा प्रशासनाने एकूण ५९ कोटी रुपयांची वसुली केली आहे. यात सर्वाधिक ४८ कोटी रुपयांची वसुली गौणखनिजमधून झाली आहे.

जिल्हा प्रशासनाला यंदा २0१८-२0१९ या आर्थिक वर्षासाठी ७0 कोटी ३१ लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ५९ कोटी ३५ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत. गौणखनिजसाठी दिलेल्या ६0 कोटी उद्दिष्टापैकी ४८ कोटी ८७ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे. माती, मुरुम, दगड आणि राष्ट्रीय रस्त्यांच्या कामांतील रॉयल्टीमधून कराची वसुली करण्यात प्रशासनाला यश आले आहे. गौणखनिजमधील दीड वर्षापूर्वीची थकबाकी मोठी होती. कारवाईचा इशारा दिल्याने थकीत वसुली झाली आहे. राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी दिलेले महसूलचे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू आहे.

जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे यावर्षी जमीन महसूल कराचे उद्दिष्ट पूर्ण होणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. राज्य शासनाने दिलेल्या दुष्काळी उपाययोजनांमध्ये शेतसारा वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. याशिवाय मूळ शेतसाºयाची सवलत देण्यात आली आहे. या सवलतीचे १६ लाख ३३ हजार रुपये माफ झाले आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांकडून जमीन महसुलाची रक्कम भरण्यात येत आहे. त्यामुळे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण होऊन ११ कोटी ८८ लाख रुपये वसूल झाले. शासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल ८४.४१ टक्के वसुली झाली असून, येत्या पंधरा दिवसात १0 कोटीची वसुली पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न राहणार आहे. परंतु शासनाकडून दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. जमीन महसुलाचे १0 कोटी ३१ लाख रुपयांचे उद्दिष्ट होते. जिल्ह्याला २0१७-१८ या आर्थिक वर्षात ७0 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मागीलवर्षी केवळ ३८ कोटी रुपयांची वसुली झाली होती. यंदा त्यापेक्षा कितीतरी मोठी वसुली करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.पाच कोटीचा फटकागेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उद्दिष्ट अधिक असले तरी, करमणूक करापोटी दरवर्षी मिळणारे कोट्यवधी रुपये, तसेच शिक्षण उपकर व रोहयो करापोटी मिळणारे कर आता बंद करण्यात आल्याने प्रशासनाला जवळपास पाच कोटींचा फटका बसणार आहे. अशा परिस्थितीत वसुलीचे उद्दिष्ट पार करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून महसूल अधिकारी, कर्मचाºयांची धावपळ उडाली आहे. 

महसूल विभागाकडून शासनास पत्रन्यायालयाने वाळू प्लॉटच्या लिलावाला स्थगिती दिल्याने त्यापोटी मिळणारे उत्पन्नही बंद झाले आहे. त्यामुळे नजराणा, गौणखनिज, शेतसारा, बिनशेती अशा करांच्या माध्यमातून वसुली केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच राज्य सरकारला पत्र पाठवून गौणखनिज, करमणूक कर आदी करांपासून मिळणारे उत्पन्न बंद झाल्याचे कळविले आहे. त्यामुळे शासनस्तरावर यासंदर्भात निर्णय होण्याची आशा महसूल खाते बाळगून आहे.

टॅग्स :Sangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी