शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

सांगली :  राजू शेट्टींकडून शेतकऱ्यांची फसवणूक; संजय कोले यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 4:25 PM

कायद्यानेच १४ दिवसात एफआरपी देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे असताना पंधरा दिवस आंदोलन करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांबरोबर एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना सहकार आघाडीचे व प्रचारप्रमुख संजय कोले यांनी सांगलीत सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्दे राजू शेट्टींकडून शेतकऱ्यांची फसवणूक; संजय कोले यांचा आरोपगुजरात पॅटर्नसाठी राज्यभर आंदोलन करणार

सांगली : कायद्यानेच १४ दिवसात एफआरपी देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे असताना पंधरा दिवस आंदोलन करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांबरोबर एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना सहकार आघाडीचे व प्रचारप्रमुख संजय कोले यांनी सांगलीत सोमवारी पत्रकार परिषदेत केली. गुजरात पॅटर्न राबविण्यासाठी राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी शासनाचा ऊस नियंत्रण आदेश १९६६ हा कायदा आधीपासूनच अस्तित्वात आहे. कायद्यानेच सर्वच कारखानदारांनी ऊस गळितास गेल्यानंतर १४ दिवसांमध्ये एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली पाहिजे. एफआरपी दिली नाही, तर कायद्याने हा गुन्हा असून कारवाईस कारखाना व्यवस्थापन पात्र आहे. असे असतानाही शेट्टी यांनी पंधरा दिवस आंदोलन करुन कारखानदारांशी एफआरपी एकरकमी देण्याचा तोडगा काढला आहे. यामुळे शेतकऱ्यांचेच नुकसान झाले आहे.

शासनाने हंगाम वीस दिवस आधी सुरू करण्यास परवानगी दिली होती. कारण राज्यातली दुष्काळी परिस्थिती, कमी पडणारे पाणी, हुमणी, कमी होणारा उतारा याचा विचार करून हा निर्णय घेतला होता. मात्र आता वीस दिवस हंगाम लांबल्याने शेतकऱ्यांपुढील या समस्या वाढलेल्या आहेत. तसेच सध्याचे साखरेचे दर लक्षात घेता, शेतकऱ्यांच्या पदरात एफआरपी पडेलच याची खात्रीही देता येत नाही. कारण, साखरेचे चालू बाजारभावाप्रमाणे मूल्यांकन करून त्यावर बँका ८५ ते ९० टक्के उचल देतात.

बँकांकडील उचल व उपपदार्थांतून मिळणारी रक्कम यामधून तोडणी, वाहतूक, गाळप खर्च वजा जाता, एफआरपी देण्यासाठी प्रति टनाला ४०० ते ५०० रुपये कमी पडतात. याच मुद्यावर कारखानदारांनी शॉर्ट मार्जिनचे कारण देऊन कारखाने बंद ठेवले होते. मग आता वीस दिवसात असे काय झाले, की कारखान्यांचे हे शॉर्ट मार्जिन भरून निघाले!कारखाने एकरकमी एफआरपी कसे देणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. गतवर्षी देखील असाच निर्णय झाला. पहिल्या आठवड्यात कारखान्यांनी एफआरपी एकरकमी दिली, मात्र त्यानंतर त्यांनी त्याचे तुकडे पाडले. याला काही पर्यायही नव्हता. यावर्षीही गेल्यावर्षीचीच परिस्थिती आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला माहीत असतानाही, आंदोलनाचे नाटक कशासाठी केले?, असा सवालही कोले यांनी शेट्टी यांना केला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगलीFarmerशेतकरी