शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

‘सांगली’ जयसिंगपूरला विना थांबा

By admin | Published: April 17, 2016 11:25 PM

‘विना थांबा’ ठरतोय मारक : कोल्हापूर, इचलकरंजी मार्गावरील प्रवाशांची गैरसोय

संतोष बामणे -- जयसिंगपूर --कोल्हापूर-सांगली मार्गावर विना थांबा, विनावाहक एस़टी़ गेल्या आठवडाभरापासून सुरू झाली आहे़ या एस़टी़मुळे सांगली व कोल्हापूरला थेट प्रवास करणाऱ्यांची चांगली सोय झाली आहे़ मात्र, जयसिंगपूर व अन्य ठिकाणी या मार्गावर थांबणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे़ त्यामुळे ही सेवा शिरोळ तालुक्यातील प्रवाशांना डोकेदुखी ठरली आहे़ धावत्या युगात कमी कालावधीत कामगारांना व प्रवाशांना थेट त्या-त्या गावाला जाण्यासाठी सोय व्हावी, या हेतूने सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी या चार आगारांकडून सांगली-कोल्हापूर, सांगली-इचलकरंजी व मिरज-इचलकरंजी अशा विना थांबा, विनावाहक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत़ यामुळेच सांगली, मिरज, कोल्हापूर, इचलकरंजी या चार शहरांतील प्रवाशांच्या वेळेची बचत झाली असली तरी या मार्गावर मुख्य जयसिंगपूर बसस्थानक असून, येथून हजारो प्रवासी दैनंदिन प्रवास करीत असतात़ याबरोबर सांगली-कोल्हापूर, इचलकरंजी या मार्गावर मोठमोठी गावे असल्यामुळे प्रवासी वर्ग अधिक आहे़ मात्र, या सेवेमुळे जयसिंगपूरच्या प्रवाशांना विना थांब्याचा त्रास होत असून, ताटकळत थांबून साधी गाडी येईपर्यंत वाट पाहावी लागत आहे़ कोल्हापूर-सांगली विना थांबा बस सुरू असल्याने जयसिंगपूर बसस्थानकात कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या घटली असून, लांब पल्ल्याच्या सोलापूर, पंढरपूर, आदी मराठवाड्यातून येणाऱ्या गाड्यांवर जयसिंगपूरच्या प्रवाशांना विसंबून राहावे लागत आहे़ दरम्यान, सांगली-कोल्हापूर मार्गावर विनावाहक वगळता एशियाड बसेसची संख्या वाढली आहे़ त्यामुळे प्रवाशांना या गाडीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़ दरम्यान, सांगली-इचलकरंजी व मिरज-इचलकरंजी या मार्गावर धामणी, अंकली, उदगाव, जयसिंगपूर, खोतवाडी, यड्राव, चिपरी, तारदाळ, आदी गावांतील प्रवासी मोठ्या संख्येने असल्यामुळे विना थांबा सेवेचा त्रास या गावांनाही सहन करावा लागत आहे़ प्रवासी बसथांब्यावर थांबले असता विना थांबा बस निम्मी रिकामी समोरून जाते. मात्र, तिला थांबा नसल्यामुळे ती थांबत नाही. तसेच त्यामागून येणारी बस ही साधी असल्यास ती प्रवासी भरगच्च भरून येत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी अवस्थानिर्माण झाली आहे़ प्रवाशांतून तीव्र नाराजीसांगली-कोल्हापूर महामार्गावरील जयसिंगपूर हे मोठे शहर आहे़ येथून दररोज १६०० बसेसची ये-जा होत असल्याने प्रवासी वर्ग मोठा आहे़ यातच विना थांबा, विनावाहक इचलकरंजी, कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एस़टी.चा नेमका फायदा प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ होताना दिसत आहे़ त्यामुळे जयसिंगपूर शहरातून या बसला तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे़ प्रवाशांतून तीव्र नाराजीसांगली-कोल्हापूर महामार्गावरील जयसिंगपूर हे मोठे शहर आहे़ येथून दररोज १६०० बसेसची ये-जा होत असल्याने प्रवासी वर्ग मोठा आहे़ यातच विना थांबा, विनावाहक इचलकरंजी, कोल्हापूरकडे जाणाऱ्या मार्गावर प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़ त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या एस़टी.चा नेमका फायदा प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ होताना दिसत आहे़ त्यामुळे जयसिंगपूर शहरातून या बसला तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त होत आहे़ सांगली-कोल्हापूर मार्गावर विना थांबा बससेवा सुरू झाल्यामुळे जयसिंगपूरसह अन्य ठिकाणच्या प्रवाशांना ताटकळत थांबल्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही़ तर साधी बस आल्यास ती प्रवासी भरगच्च भरून येते़ त्यामुळे कोल्हापूरला कसे जायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ सांगली-कोल्हापूर मार्गावर साध्या गाड्यांची सोय करून सर्व ठिकाणी थांबतील व ग्रामीण भागातील लोकांनाही या एस़टी़चा लाभ होईल, असा विचार महामंडळाने करून साध्या गाड्याही प्रत्येक अर्ध्या तासाला सोडणे गरजेचे आहे़