शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

Sangli: सांगलीची खासदारकीची जागा ‘स्वाभिमानी’ लढणार, राजू शेट्टींनी दिले स्पष्ट संकेत

By अविनाश कोळी | Published: August 24, 2023 5:01 PM

Sangli: शेतकऱ्यांनी माझ्या जोडीला सांगली लोकसभा मतदारसंघातूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार संसदेत पाठविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले.

- अविनाश कोळीमालगाव - कोणताही पक्ष स्वार्थासाठी शेतकऱ्यांची बाजू घेतो, मात्र सत्ता येताच त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडतो. ही राजकीय व्यवस्था उलथून टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी माझ्या जोडीला सांगली लोकसभा मतदारसंघातूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार संसदेत पाठविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले.

मालगाव येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल शेट्टी व जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचा सत्कार उपाध्यक्ष संजय खोलकुंबे व तालुकाध्यक्ष सुरेश वावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सावकार मदनाईक, मिलिंद साखरपे संजय बेले उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस सोयाबीनला आठ हजार दर मागत होते. आता सोयाबीन दर पाच हजार झाला आहे. सत्तेत असताना यावर ते बोलत नाहीत. शरद पवार सत्तेत होते त्यावेळी वीज दरावर काही बोलत नव्हते, मात्र सध्या ते वीज दरवाढीला विरोध करत आहेत. सर्वच राजकीय पक्ष सत्ता नसताना स्वार्थासाठी शेतकरी हितावर बोलतात, मात्र सत्ता मिळताच शेतकऱ्यांना विसरतात हे वास्तव आहे.

ऊस, द्राक्षासह कोणतीही शेती सध्या परवडत नाही. याचे कारण उत्पादन खर्च प्रचंड वाढलेला आहे. मात्र, त्या तुलनेत शेतीमालाचे भाव वाढत नाहीत. शेतकऱ्यांना कोणताच टॅक्स नाही असे अनेकजण ओरडत असतात. पण, ऊस उत्पादक शेतकरी राज्य आणि केंद्र शासनाला ३३ हजार कोटी रुपये कर देतोय. त्यामुळे आमचे उत्पन्न सिद्ध करा आणि आम्हालाही इन्कम टॅक्स लावा, असे जाहीर आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangliसांगली