शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

नदीला नाला जोडणारी सांगली पहिली पालिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 4:25 PM

देशात नद्या जोड प्रकल्प असताना, महापालिका शेरीनाला व कृष्णा नदी जोड प्रकल्प राबविला आहे. नाला व नदी जोडणारी सांगली ही पहिली महापालिका ठरल्याची उपरोधिक टीका नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली. नदी प्रदूषणामुळे नागरिकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा सवालही त्यांनी केला.

ठळक मुद्देनदीला नाला जोडणारी सांगली पहिली पालिका!नागरिकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का?

सांंगली : देशात नद्या जोड प्रकल्प असताना, महापालिका शेरीनाला व कृष्णा नदी जोड प्रकल्प राबविला आहे. नाला व नदी जोडणारी सांगली ही पहिली महापालिका ठरल्याची उपरोधिक टीका नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली. नदी प्रदूषणामुळे नागरिकांचे बळी गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा सवालही त्यांनी केला.साखळकर म्हणाले, ४० कोटी खर्चून शेरीनाला शुद्धीकरण योजना राबविली. पण ही योजना पूर्ण क्षमतेने सुरू नाही. शेरीनाल्यासह शहराचे सर्व सांडपाणी सरकारी घाटापासून पुढे थेट नदीपात्रात मिसळते. महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. याबद्दल प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पंचनामा करून महापालिकेला नोटीसही बजावली. तरीही महापालिकेने काहीच केले नाही. आजही लाखो लिटर सांडपाणी खुलेआम नदीत मिसळत आहे. महापालिकेने शेरीनाल्याचे सांडपाणी पुढे नदीकाठी नाल्याद्वारे उचलून नदीतच सोडले आहे. नदीत आता पाणीपातळी कमी असल्याने प्रदूषणाचा धोका वाढला आहे.ते म्हणाले, एकीकडे नदी स्वच्छता अभियान राबवायचे नाटक केले जाते. गणपती विसर्जन, निर्माल्यामुळे प्रदूषण होते, म्हणून त्यासाठी उपक्रम राबविला जातो. मात्र दुसरीकडे शेरीनाल्याचे, ड्रेनेजचे पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी स्वच्छ होते का? नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडे पैसे नाहीत, मात्र पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे सुशोभिकरण मात्र जोरात सुरू आहे. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने महापालिकेवर फौजदारी दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणीही साखळकर यांनी केली.

टॅग्स :pollutionप्रदूषणMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली