शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
2
"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?
3
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?
4
एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास
5
हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
6
गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज
7
दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला...
8
Stock Market Opening: US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी
9
"अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?"
10
Dolly Chaiwala : 'डॉली चायवाला'ची फी ऐकून फुटेल घाम! मॅनेजर ठरवतो डील्स; मागण्यांचीही मोठी यादी
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक!
12
कोण आहे अमानत? जी होणार केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी सून; चौहान कुटुंब आनंदात
13
आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."
14
परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
15
गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार
16
'बिग बॉस मराठी'नंतर 'बिग बॉस हिंदी'चा नवा सीझन येणार, सलमानच्या आवाजातील प्रोमो समोर, थीमही आहे खास
17
‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली
18
अवघड गणित होणार सोपे! शिक्षण विभाग शाळांमध्ये राबविणार गणित सात्मीकरण प्रणाली
19
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
20
‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी: पूरस्थितीमुळे सातारा-कोल्हापूर विशेष रेल्वे धावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2024 8:17 PM

मध्य रेल्वेकडून हिरवा कंदील : १३ ऑगस्टपर्यंत दररोज फेऱ्या.

अविनाश कोळी/सांगली, लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : नागरिक जागृती मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. बुधवारी ७ ऑगस्टपासून १३ ऑगस्टपर्यंत सातारा-सांगली-कोल्हापूर विशेष रेल्वे गाडी दररोज धावणार आहे.

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे २० जुलैपासून कृष्णा, वारणा, कोयना, पंचगंगा, येरळा नद्या भरून वाहत आहेत. तिन्ही जिल्ह्यातील अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली आहेत. सध्या पूर ओसरत असला तरी वाहतूक सुरळीत होण्यास काही दिवस लागणार आहेत. पुराच्या काळात सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील अनेक गावांतील एसटीच्या फेऱ्या रद्द झाल्या. अजूनही काही मार्गावर फेऱ्या बंद आहेत.

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात अशीच पुरस्थिती झाल्यानंतर दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने चार संपर्क क्रांती व ईतर १० रेल्वे गाड्यांना उगारखुर्द व कुडची स्थानकांवर थांबा दिला होता. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी संपर्क क्रांती गाड्या सांगली, भिलवडी, कराड व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबवाव्या तसेच किर्लोस्करवाडी व भिलवडी येथे आणखी दहा गाड्यांना थांबा देण्याची विनंती सांगली जिल्हा नागरीक जागृती मंचने केली होती. पण मध्य रेल्वेने काहीही निर्णय घेतला नाही. त्यामुळे मंचने पंतप्रधानांकडे ऑनलाईन तक्रार केली. त्यावर रेल्वे विभागाने सातारा-सांगली-कोल्हापूर पूर विषेश रेल्वे गाडी सुरू केल्याचे सांगितले.

अशी धावणार सातारा-कोल्हापूर गाडी (क्र. ०१४१२)

सातारा दुपारी २:२०, कोरेगाव २.३३, रहीमतपूर २.४३, तारगाव २.५३, मसूर ३.०५, शिरवडे ३.१५, कराड ३.२५, शेणोली ३.३८, भवानीनगर ३.४५, ताकारी ३.५०, किर्लोस्करवाडी ४, भिलवडी ४.१५, नांद्रे ४.२३, सांगली ४.३८, विश्रामबाग ४.४३, मिरज सायं. ५.२०, जयसिंगपूर ५.३५, हातकणंगले ५.५०, रुकडी ६, वळिवडे ६.०६, कोल्हापूर सायंकाळी ६.३५चौकट

अशी धावणार कोल्हापूर-सातारा गाडी (क्र. ०१४११)कोल्हापूर सकाळी ८.४०, वळीवडे, ८.४८, रुकडी ८.५५, हातकणंगले ९.०५, जयसिंगपूर ९.२०, मिरज सकाळी ९.४५, विश्रामबाग ९.५३, सांगली १०, नांद्रे १०.१५, भिलवडी १०.२५, किर्लोस्करवाडी १०.४०, ताकारी १०.५०, भवानीनगर १०.५५, शेणोली ११.०५, कराड ११.२५, शिरवडे ११.३५, मसूर ११.५०, तारगाव दुपारी १२, रहीमतपूर, १२.१०, कोरेगाव १२.२५, सातारा १,३५

सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी या विशेष रेल्वे गाडीचा लाभ घ्यावा तसेच सांगली रेल्वे स्टेशनवर या गाडीची येण्याची वेळ सोयीस्कर असल्याने सांगली स्टेशन जवळील मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या लोकांना मोठा लाभ होणार आहे. सर्व थांबे दिल्याने विश्रामबागपर्यंत येणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचीही सोय होणार आहे

- सतीश साखळकर, अध्यक्ष नागरिक जागृती मंच

टॅग्स :Sangliसांगलीfloodपूरrailwayरेल्वे