शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

पालकमंत्र्यांकडून स्वार्थी राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 1:06 AM

जत : मागील साडेतीन वर्षात पालकमंत्री जत येथे आले नाहीत. परंतु नगरपालिका निवडणूक सुरु झाल्यानंतर आठ दिवसात दोन वेळा ते येथे आले आहेत. स्वार्थी हेतू ठेवून केवळ राजकारण करण्यासाठी ते येत आहेत. शहरातील सूज्ञ मतदारांनी त्यांचा हेतू ओळखून मतदान करावे, असे आवाहन प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.जत ...

जत : मागील साडेतीन वर्षात पालकमंत्री जत येथे आले नाहीत. परंतु नगरपालिका निवडणूक सुरु झाल्यानंतर आठ दिवसात दोन वेळा ते येथे आले आहेत. स्वार्थी हेतू ठेवून केवळ राजकारण करण्यासाठी ते येत आहेत. शहरातील सूज्ञ मतदारांनी त्यांचा हेतू ओळखून मतदान करावे, असे आवाहन प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष विश्वजित कदम यांनी केले.जत नगरपालिका निवडणूक प्रचारार्थ थोरली वेस जत येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. जत तालुक्यात मागील उन्हाळ्यात ८२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु असताना पालकमंत्र्यांनी येऊन आढावा बैठक घेतली नाही. जत नगरपालिकेचे बजेट ५२ कोटी रुपये इतके आहे. परंतु उत्पन्न कमी आहे. येथील विकास कामासाठी आ. मोहनराव कदम यांचा विधानपरिषद निधी वापरुन विकास पूर्ण करु अशी ग्वाही देऊन विश्वजित कदम पुढे म्हणाले की, जत नगरपालिकेचा विकास होऊ नये म्हणून विरोधकांनी येथे काही ठेकेदार कार्यकर्ते जाणीवपूर्वक निर्माण केले. त्यांनी कमी किंमतीची निविदा भरुन इतरांना काम करु दिले नाही असेही त्यांनी सांगितले.सुरेश शिंदे यांची आम्ही काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करणार होते ते स्वत:हून इतरत्र गेले ते चांगलेच झाले आहे. आता जत तालुका कमिटी काँग्रेस स्वच्छ झाला आहे, असे त्यांनी सांगितले.विक्रम सावंत म्हणाले की, मागील पाच वर्षात आमच्याकडे बहुमत नव्हते त्यामुळे अपेक्षेप्रमाणे विकास करता आला नाही. आता बहुमत दिल्यास निश्चित विकास करु अशी ग्वाही त्यांनी दिली.नगराध्यक्ष इकबाल गवंडी म्हणाले, आम्ही भ्रष्टाचार केला असता तर जनतेने त्याचवेळी आम्हाला बाजूला केले असते. सुरेश शिंदे यांनी बुलडोझर लावून जत शहराला लुटले आहे, असा आरोप त्यांनी केला. सुरुवातीस आप्पू बिराजदार यांनी स्वागत केले. यानंतर सुजय शिंदे, मोहन कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी बाबासाहेब कोडग, शुभांगी बन्नेनवार, परशुराम मोरे, महादेव कोळी, अ‍ॅड. युवराज निकम, रवींद्र सावंत, मनीषा साळे, मंदाकिनी बेळंखी, नंदा व्हनमाने आदी उपस्थित होते. इराण्णा निडोणी यांनी आभार माानले. यावेळी कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारण