शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

शिराळ्यात तीव्र दुष्काळ, तरीही मदत नाही

By admin | Published: April 11, 2016 11:21 PM

४५ गावे ५० पैसेवारीपेक्षा कमी : शासनाच्या भूमिकेवर शेतकरी नाराज

विकास शहा -- शिराळाशिराळा तालुक्याला पहिल्यांदाच मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. शासनाची नजर पैसेवारी, सुधारित पैसेवारी आणि अंतिम पैसेवारी झाली. अंतिम पैसेवारीत ४५ गावे ५० पैसेवारीपेक्षा कमी आहेत. मात्र शासनाकडून अद्याप एकही पैशाची मदत या गावांना मिळालेली नाही. शासन येथील शेतकरी आत्महत्या करणार तेव्हाच जागे होणार काय? असा सवाल उपस्थित होत आहे.या तालुक्यातील वारणा काठ सोडला, तर सर्व गावात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप गेला, रब्बी हंगामही गेला. शासनाने प्रथम दि. १५ सप्टेंबर रोजी नजर पैसेवारी (अंदाजे) केली. ३१ आॅक्टोबर रोजी सुधारित पैसेवारी केली. याचबरोबर १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी केली. या पैसेवारीसाठी भात पीक ग्राह्य धरण्यात आले होते. अनेक तालुक्यात नजर पैसेवारी शासनाचा निधी आला आहे. मात्र या तालुक्यातील शिरसी, आंबेवाडी, धामवडे, कोंडाईवाडी, टाकवे, बांबवडे, पाचुंब्री, भैरेवाडी, पणुंंब्रे तर्फ शिराळा, घागरेवाडी, गिरजवडे, शिवारवाडी, निगडी, औंढी, करमाळे, चरण, नाठवडे, मोहरे, आरळा, येसलेवाडी, भाष्टेवाडी, बेरडेवाडी, सोनवडे, मणदूर, गुढे, मानेवाडी, पाचगणी, काळुंद्रे, खराळे, चिंचेवाडी, करुंगली, मराठवाडी, पणुंबे तर्फ शिराळा, कुसळेवाडी, कदमवाडी, किनरेवाडी, कुसाईवाडी, शिंदेवाडी, येळापूूर, गवळेवाडी, मेणी, रांजणवाडी, सावंतवाडी, शिरसटवाडी, हातेगाव या ४५ गावांची आणेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. मात्र अद्याप या गावांना एक रुपयाचीही मदत शासनाकडून मिळालेली नाही.शासनाने या गावांना त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच आता आणखी अनेक गावात सध्या पीक, पाणी स्थिती भयानक झाली आहे. त्यामुळे या गावांचा पुन्हा सर्व्हे करावा, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करित आहेत.राज्यकर्त्यांचा पाठपुरावा कमीशिराळा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे बहुतांशी भागामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. खरिपाबरोबर रब्बी हंगामातील पिकेही वाया गेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच पडले नाही, तरीही शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून गावे घोषित केली नाहीत. याकडे तालुक्यातील राज्यकर्त्यांचेही प्रयत्न कमी पडल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.