शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

..तर आगामी सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र लढेल, संजय विभुतेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2023 5:29 PM

जयंत पाटील, विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी आपापसातील जिरवाजिरवी बंद करावी

सांगली : काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये मोठ्या पदावर काम करणारे नेतेच एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. त्यांनी या तिरक्या चाली थांबविल्या नाहीत, तर बाजार समितीसह पुढील सर्व निवडणुका शिवसेना (ठाकरे गट) स्वतंत्रपणे लढवेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष संजय विभुते यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी एकसंध व मजबूत होत असताना जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते एकमेकांवर कुरघोड्या करत आहेत. भाजप आणि मिंधे गट हा आमचा मुख्य शत्रू आहे. जिल्ह्यात मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिरक्या चाली चालत आहे. त्यांनी ते बंद करावे. बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी करावी. अन्यथा जिल्ह्यात शिवसेना या दोन पक्षांसोबत कधीही जाणार नाही.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांची जबाबदारी अधिक आहे. त्यांनीच यावर तोडगा काढावा. महाविकास आघाडी एकदिलाने लढली तर बाजार समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करू शकतो. वेगळे लढलो तर भाजप आपल्याला संपवून टाकेल, असे स्पष्ट गणित आहे, असे ते म्हणाले.

तिन्ही नेत्यांनी जिरवाजिरवी बंद करावीजयंत पाटील, आमदार विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी एकदा ठरवून आपापसातील जिरवाजिरवी बंद करावी. अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन किमान जिल्ह्यापुरते तरी स्वतंत्र लढू, असे विभूते म्हणाले.क्षीरसागर क्षुल्लकनियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर विभूते यांनी टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, आम्हाला शिल्लक सेना म्हणणारे क्षीरसागर किती क्षुल्लक आहेत, हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल. ठाकरे कुटुंबाने त्यांना मानाची पदे दिले, आमदारकी दिली. ते खाल्ल्या घराचे वासे मोजत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीShiv SenaशिवसेनाRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस