शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

समाज एकत्र नाही, ही देशाची शोकांतिका

By admin | Published: January 18, 2016 11:16 PM

रामदास फुटाणे : शिराळा येथील यशवंत व्याख्यानमालेस प्रारंभ

कोकरुड : सद्य परिस्थितीत राज्यकर्त्यांनी सामान्य लोकांना जाती-जातीच्या राजकारणात गुंतविल्यामुळे आजचा समाज एकत्र येत नाही, ही भारताची फार मोठी शोकांतिका आहे, असे प्रतिपादन माजी आमदार, ज्येष्ठ कवी व वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी केले. शिराळा येथील यशवंत व्याख्यानमालेत ‘भारत कधी... कधी... माझा देश...’ या विषयावर पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वाळवा तालुका तहसीलदार वैशाली सरनोबत होत्या. रामदास फुटाणे म्हणाले की, जोपर्यंत गरिबांची मुले जिल्हा परिषदेच्या किंवा महापालिकेच्या शाळेत शिकत आहेत, तोपर्यंत मराठी भाषेला मरण नाही. श्रीमंतांची व मध्यमवर्गीयांची मुले इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहेत. त्यामुळे मराठी भाषेचा बळी देऊन इंग्रजी भाषा घरात घुसत आहे. इंग्रजी जगाची संपर्क भाषा आहे. ती भाषा आली पाहिजे. नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना इंग्रजी आले पाहिजे. परंतु आजी, आजोबा, आई, अण्णा, काका, मामा, बापू हे जिव्हाळ्याचे शब्द घरामध्ये टिकले पाहिजेत. आपल्याला ज्ञानोबांचा, तुकारामांचा, शिवबांचा महाराष्ट्र घेऊन परदेशामध्ये जायचे आहे, अशी मानसिकता आजच्या युवकांमध्ये असली पाहिजे. देशामध्ये जी अर्थव्यवस्था चालली आहे, त्यामध्ये मोठी तफावत आहे. ती कोणासाठी आहे हेच समजत नाही. काळ बदलला तरी वर्षानुवर्षे शेतकरी मात्र चार-पाच हजारावरच राबत आहे. यामध्ये दिवसातून दोन तास कष्ट घेऊन लाखो रुपयांचे काम करणाऱ्यांमध्ये कधी तरी संघर्ष होणार, हे निश्चित आहे. यावेळी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक, सिनेअभिनेते विलास रकटे, जि. प. सदस्य रणधीर नाईक, सुखदेव पाटील, सतीश पाटील, महेश पाटील, उत्तम निकम, विजयराव यादव, अजिंक्य कुंभार उपस्थित होते. (वार्ताहर)