शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

समाजाने ‘कृष्णाकाठ’चा अभ्यास करावा

By admin | Published: March 24, 2017 11:40 PM

अप्पासाहेब खोत : वडगाव हवेलीत यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त कार्यक्रम

वडगाव हवेली : ‘आजच्या राजकीय परिस्थितीत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची होत असलेली पायमल्ली घृणास्पद आहे. आजच्या समाजाने ज्ञानेश्वरी बरोबरच ‘कृष्णाकाठ’चाही अभ्यास करावा,’ असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ कथाकथनकार अप्पासाहेब खोत यांनी व्यक्त केले. वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथील ग्रामस्थ व सेवाभावी संस्थांच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कऱ्हाड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी होते. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव जाधव, कृष्णेचे संचालक दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, पांडुरंग होणमाने, कऱ्हाडचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, जगदीश जगताप, विशाल पवार, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका ठावरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. खोत म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वसा व वारसा आजही या परिसरात जोपासला जातो. प्रत्येकाने आपल्या जीवनात संयम नावाची गोष्ट जवळ ठेवावी. यशवंतराव यांच्याकडे ती पराकोटीने होती म्हणूनच ते घडले. चव्हाण यांनी सुरू केलेली ईबीसी सवलत योजना आज नसती तर आजच्या पिढीला शैक्षणिक प्रगती करता आलीच नसती. त्यांनी मातेबरोबरच मातीवरही प्रेम केले. जो माणूस मातीशी इमानी राहतो तो जीवनात कधीही अयशस्वी होत नाही. आजच्या मुलांना थोर लोकांचे जीवनचरित्र वाचण्यास द्यावी व मुलांअगोदर ती पालकांनी आत्मसात करावी. त्यांचा आदर्श नेहमीच स्मरणात राहावा ही काळाची गरज आहे.’ यावेळी सुभाषराव जोशी, जगदीश जगताप आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमात कऱ्हाड तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक तसेच येथील विविध क्षेत्रात यशस्वी झालेल्या गुणवंत खेळाडू व विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, सुहास पवार, चंद्रकांत मदने, जयश्री जाधव, मनीषा पाटील, अर्चना गायकवाड, सरपंच शंकर ठावरे, शिवराज जगताप, सत्यवान जगताप, धनंजय जगताप, बाळासाहेब जगताप, जे. के. जगताप, सुभाष जगताप आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)