शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

महाआघाडी सरकारवर काही सत्ताधारी आमदारच नाराज, तर काही समाधानी; सांगली जिल्ह्यातील स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 5:15 PM

एकीकडे सरकारच्या कामगिरीवर विरोधी पक्षाचे आमदार टीका करीत असताना आता सत्ताधारी आमदारांनीही तसाच सूर ओढण्यास सुरुवात केली आहे.

सांगली : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे होत आली आहेत. या सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेनाकाँग्रेसच्या आमदारांमध्ये सरकारच्या कामकाजावरुन समन्वय नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे, मात्र सत्ताधारी आमदारच सरकारच्या कामगिरीवर खूश नसल्याची बाब समोर येत आहे. आमदारांच्या मतदारसंघातील कामे होत नसल्याच्या तक्रारी प्रामुख्याने केल्या जात आहेत.  सांगली जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष मानला जातो. त्यानंतर काँग्रेस, भाजप व शिवसेनेचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात अपक्ष एकही आमदार नाही. एकीकडे सरकारच्या कामगिरीवर विरोधी पक्षाचे आमदार टीका करीत असताना आता सत्ताधारी आमदारांनीही तसाच सूर ओढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातही अशीच स्थिती दिसते.सरकारच्या कामगिरीवर सत्ताधारी आमदार समाधानी आहेत का?काँग्रेसविश्वजित कदम : कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मतदारसंघाला विकासाचे रोल मॉडेल केल्याचे सांगितले आहे.  विक्रम सावंत : मतदारसंघातील कामे प्राधान्याने व्हायला हवीत. येथील पाणीप्रश्न महत्त्वाचा असल्याने त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. प्रतिव्यक्ती जमीनधारणेत सर्वात मोठा तालुका असूनही जतच्या योजनांकडे दुर्लक्ष होत आहे, असे सावंत म्हणाले.राष्ट्रवादीजयंत पाटील : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.मानसिंगराव नाईक : शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, तालुक्यातील सर्व महत्त्वाची कामे महाविकास आघाडी सरकारमुळे मार्गी लागली आहेत. मतदारसंघातील कामे प्राधान्याने पूर्ण झाली. कुठेही अडचणी आल्या नाहीत.सुमनताई पाटील : राज्य सरकारच्या एकूणच कामगिरीबाबत मी समाधानी आहे. आम्ही सुचविलेली अनेक कामे मंजूर होतात, असे तासगाव-कवठेमहांकाळच्या आ. सुमनताई पाटील यांनी सांगितले.शिवसेनाअनिल बाबर :  खानापूर मतदारसंघातील कामे होत नसल्याबाबत बाबर यांनी पक्षीय नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र याबाबत त्यांनी मत व्यक्त केले नाही.

नेमक्या काय आहेत तक्रारी...

  • प्रस्ताव पडून : शिवसेना, काँग्रेस हे मित्रपक्ष असूनही त्यांच्या आमदारांनी दिलेले प्रस्ताव शासनदरबारी तसेच पडून आहेत.
  • कुरघोड्यांचे राजकारण : मित्रपक्ष असूनही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कुरघोड्या केल्या जात असल्याचे शिवसेना, काँग्रेस पदाधिकारी सांगतात.
  • श्रेय लाटले जाते : एखादे काम शिवसेना, काँग्रेस आमदारांनी केले, तर त्याचे श्रेय राष्ट्रवादीचे लोक घेत आहेत.
टॅग्स :SangliसांगलीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना