शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

sangli news: खानापूरचे जवान नायब सुभेदार जयसिंग भगत अनंतात विलीन; लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 2:21 PM

सियाचिन येथे कर्तव्य बजावताना बर्फवृष्टीमुळे मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने कोम्यात गेल्याने झाला मृत्यू

पांडुरंग डोंगरे

खानापूर : खानापूरचे सुपूत्र, जवान नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत (वय-४०) यांचे लेह लडाख विभागातील सियाचिन मध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावताना निधन झाले. त्यांच्यावर आज, शनिवारी खानापुरात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.जवान नायब सुभेदार जयसिंग (बाबू ) शंकर भगत यांचे पार्थिव पुणे येथून सकाळी नऊ वाजता खानापूर येथे आणण्यात आले. 'शहीद जवान अमर रहे ' ' नायब सुभेदार जयसिंग बाबू भगत अमर रहे ' ' भारत माता की जय ' अशा जयघोषात खानापूर शहरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेत शालेय विद्यार्थी, तरूण वर्ग, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान भगत यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. पत्नी व लहान मुलांचे निशब्द चेहरे पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. खानापूर - गोरेवाडी रस्त्यालगत भगत यांच्या घराच्या पूर्वेला पटांगणावर जवान भगत यांचेवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी भारतीय सैन्यदलाच्या २२ मराठा लाइट इन्फनट्रीच्या वतीने पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. लष्करी व शासकीय मानवंदना देण्यात आली.महाराष्ट्र शासनाच्यावतीने पालक मंत्री सुरेश खाडे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार सदाशिवराव पाटील, नगराध्यक्ष डॉ उदयसिंह हजारे, जिल्हाधिकारी डॉ दयानिधी राजा, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले.खानापूर येथील जवान शहीद जयसिंग भगत हे सियाचिन येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत होते. दोन दिवसांपूर्वी सियाचिन येथे बर्फवृष्टी झाली होती. त्यावेळी झोपेत त्यांचा मेंदूतील रक्तपुरवठा गोठल्याने ते कोम्यात गेले. सदर घटना त्यांच्या साथीदारांच्या सकाळी निदर्शनास आली. त्यांनी सैन्यदलाच्या हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना चंदीगड येथे दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शहीद नायब सुभेदार जयसिंग (बाबू) शंकर भगत हे सन २००३ मध्ये सैन्य दलात भरती झाले होते. सन २०२६ मध्ये सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा, वडील, भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगली