शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
2
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
3
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
4
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
5
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
6
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
7
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
8
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
9
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
10
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
11
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
12
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
13
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
14
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
15
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
16
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
17
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
18
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
19
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
20
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...

कोयनेतून विसर्ग बंद; पुन्हा कृष्णाकाठी पाणीसंकट, पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 12:54 PM

पालकमंत्री, खासदार, आमदारांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

सांगली : कोयना धरण व्यवस्थापनाने २२ डिसेंबरपासून पाणी सोडण्याचे बंद केले आहे. त्यामुळे पुढील चार दिवसांत कृष्णा नदीपात्र कोरडे पडण्यास सुरुवात होणार आहे. पिण्याच्या पाणी योजनांसह शेतीच्या पाणी योजना आणि टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करण्यावर मोठा परिणाम होणार आहे. म्हणून कोयनेतून पुन्हा विसर्ग सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदारांची भूमिका काय असणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.कोयना धरणातून दर वीस दिवसांतून १.६ टीएमसी पाणी सांगली जिल्ह्यासाठी सोडण्याचे सूत्र आहे. १.६ टीएमसी पाणी आल्यानंतर पाच दिवस धरणातून विसर्ग बंद ठेवून पुन्हा १.६ टीएमसी पाणी सोडले जात आहे. पण, सध्या कोयना धरणाच्या पाणी व्यवस्थापनात राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळे पाणी सोडण्याचे सूत्रच विस्कळीत झाले आहे. यामुळेच कोयना धरणाच्या पाण्यावरून लोकसभा निवडणुकीपूर्वीच पाणीप्रश्न पेटला आहे.कोयनेचा विसर्ग बंद करून चार दिवस झाले, विसर्ग पुन्हा कधी सुरू होईल, याची खात्री अधिकाऱ्यांनाही नाही. यामुळे कोयनेतून पाणी सोडण्यावरून पुन्हा राजकीय वाद पेटणार का, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे.

कोयनेचे अधिकारी म्हणतात, सिंचनाची मागणीच नाहीसांगली पाटबंधारे विभागाची सिंचनाची मागणी कमी झाल्यामुळे कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट दि. २२ डिसेंबरपासून बंद केले आहे. पाटबंधारे विभागाकडून पुन्हा पाण्याची मागणी आल्यानंतरच पाणी सोडण्यात येईल, असे कोयना धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पीक वाळतानाही टेंभूचे आवर्तन लांबले

खानापूर, आटपाडी तालुक्यातील रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा पिकांना पाणी नसल्यामुळे वाळू लागले आहेत. शेतकऱ्यांनी मागणी करूनही टेंभू याेजना सुरू करण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. खासदार, आमदार तरीही लक्ष घालून टेंभू योजना सुरू करणार आहेत का, असा सवाल दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

पालकमंत्री लक्ष कधी घालणार? : अरुण लाडसातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई कोयनेतून वारंवार पाणीबंद करत आहेत. या प्रश्नावर सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे कधी लक्ष घालणार आहेत. प्रत्येकवेळी कृष्णा नदी कोरडी पडल्यानंतर शेतकऱ्यांनीच रस्त्यावर यायचे का? कधी तरी पाणीप्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन खाडे यांनी शासनाकडून पाणीप्रश्न कायमचा सोडविला पाहिजे, असे मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले. तसेच रब्बी पिके वाळत असल्यामुळे टेंभू योजना तातडीने सुरू करा, असेही ते म्हणाले.

कोयना धरणातून १.६ टीएमसी पाणी सोडल्यानंतर पाच दिवस धरणातून विसर्ग बंद केला जात आहे. त्यानंतर पुन्हा १.६ टीएमसी पाणी सोडण्याची पध्दत आहे. त्यानुसार कोयना धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याची गरज आहे. कृष्णा नदी कोरडी पडण्याची वाट पाहण्याची गरज नाही. सांगली पाटबंधारे विभागानेही पाण्याची गरज असल्याबद्दल कोयना धरण व्यवस्थापनाला कळविले पाहिजे. -विजयकुमार दिवाण, निवृत्त अभियंता

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीKoyana Damकोयना धरणriverनदी