शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कृष्णा नदीतून आजपासून उपसाबंदी; कोयना, वारणा धरणात नेमका किती पाणीसाठा..जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:25 IST

पाण्याचा काटकसरीने वापर करा

सांगली : कोयना धरणात सध्या केवळ १० टक्केच पाणीसाठा आहे. मान्सूनची चाहूल नसल्यामुळे गुरुवारपासून कोयना धरणातील विसर्ग शंभर टक्के बंद केला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने दि. २३ ते २६ जून असे चार दिवस कृष्णा नदीतील शेतीच्या पाणी उपशावर बंदी घातली आहे.कोयना धरणात सध्या एकूण १०.८२ टीएमसी म्हणजे १० टक्के पाणीसाठा आहे. पाणी वापरासाठी उपयुक्त पाणीसाठा ५.७० टीएमसी असून तो केवळ सहा टक्केच आहे. कोयना धरणातून १०५० क्युसेक विसर्ग सुरू होता, तो गुरुवारपासून बंद केला आहे. वारणा धरणात १०.७० टीएमसी म्हणजे ३१ टक्के पाणीसाठा असून, उपयुक्त पाणीसाठा ३.८२ टीएमसी म्हणजे १४ टक्के साठा आहे.कोयना धरणात कमी पाणीसाठा असल्यामुळे जलसंपदा विभागाने उपसाबंदी आदेश लागू केला आहे. त्या आदेशानुसार शुक्रवार, दि. २३ ते दि. २६ जूनपर्यंत उपसाबंदी, तर दि. २७ ते दि. ३० जून हा उपसा कालावधी आहे. पिण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजना सुरू राहतील. उपसाबंदीमध्ये पिण्याच्या पाणीपुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षासाठी रद्द करण्यात येईल.उपसा संच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल. याची गांभीर्याने नोंद घेऊन उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर लाभक्षेत्रातील उभी असणारी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचनाचा वापर करण्याचे आवाहन कार्यकारी अभियंत्या ज्योती देवकर यांनी केले आहे.

काटकसरीने वापर कराकोयना, वारणा धरणात पाणीसाठा अत्यंत कमी आहे. यामुळे कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या शेतकरी, औद्योगिक वापरकर्त्यांनी, महापालिका, नगरपालिका प्रशासनाने आणि नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन देवकर यांनी केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीDamधरणriverनदीWaterपाणी