शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

सांगली जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:45 PM

सांगली : ऊसदरावर तोडगा निघून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित केल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रविवारपासून ...

सांगली : ऊसदरावर तोडगा निघून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन स्थगित केल्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. रविवारपासून जिल्ह्याच्या सर्व भागातील ऊसतोडी गतीने सुरू झाल्या आहेत. कारखान्यांची धुराडी पेटली असून, वादाचा कडवटपणा जाऊन हंगामाचा गोडवा कारखानदारांच्या चेहऱ्यावर दिसू लागला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. त्यामुळे दराचा तोडगा काढण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या. शनिवारी दुपारी कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलनाबाबत यशस्वी तोडगा निघाल्यानंतर रात्री वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्यावर जिल्ह्यातील कारखान्यांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीतही कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे आंदोलक व कारखानदारांनी मान्य केल्यानंतर रात्री उशिरा रविवारी होणारे आंदोलन मागे घेण्यात येत असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली. एकरकमी एफआरपी तसेच साखरेला ३ हजार ४०० रुपये दर मिळाल्यास प्रतिटन २०० रुपये अधिक दर देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आंदोलन मागे घेतल्याने रविवारी सकाळपासून जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यात ऊसतोडीला सुरुवात झाली.सांगलीतील दत्त इंडिया प्रा. लि. चा वसंतदादा कारखाना, राजारामबापू कारखान्याचे चारही युनिट, सोनहिरा, क्रांती, हुतात्मा, मोहनराव शिंदे यासह सर्व प्रमुख सहकारी साखर कारखाने, खासगी कारखान्यांची धुराडी रविवारी पेटली. ऊसतोडीला वेग आल्याने दिवसभर मजुरांची, वाहनांची लगबग सुरू होती. रस्त्यावरील ऊसवाहतूक करणाºया वाहनांची संख्याही वाढली होती. मिरज, तासगाव, वाळवा, शिराळा, कडेगाव, खानापूर, आटपाडी, पलूस याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऊसतोडी सुरू होत्या.दत्त इंडियाचे कार्यकारी संचालक मृत्युंजय शिंदे यांनी सांगितले की, शनिवारी रात्री तोडगा निघाल्याने कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. रविवारी आम्ही पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू केला असून, तोडींनाही प्रारंभ झाला आहे. आता कोणतीही अडचण नाही. हा हंगाम चांगल्या पद्धतीने पार पडेल, अशी आशा आहे.