शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

..'तर साखर कारखान्यांच्या अध्यक्षांच्या घरासमोर ठिय्या मारु'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 5:37 PM

जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत.

सांगली : जिल्ह्यात अद्याप सुमारे २० ते २५ हजार हेक्टरवरील तोडणी आणि गाळप होईपर्यंत साखर कारखाने बंद करू नयेत अशी मागणी स्वाभिमानी संघटनेने केली आहे. कारखाने बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला.खराडे म्हणाले, जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत, मात्र त्याचेही गाळप झालेच पाहिजे.ताकारी, म्हैसाळ, टेंभू, आरफळ, विसापूर, पुणदी सिंचन योजना सुरू झाल्याने दुष्काळी भागात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊस वाढला तरी तासगाव, नागेवाडी, महांकाली आणि माणगंगा केन ॲग्रो कारखाने बंद आहेत. त्यामुळे ऊसाच्या संपुर्ण गाळपात अडचणी आहेत.ऊस शिल्लक राहण्याची शक्यता असल्याची बाब साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या निदर्शनास यापूर्वीच आणून दिली होती. त्यानुसार त्यांनी सर्व कारखान्यांना आवश्यक सूचनाही दिल्या होत्या. तरीही काही कारखान्यांनी गाळप हंगामाच्या सांगतेची तयारी सुरू केली आहे. सांगलीतील दत्त इंडिया तथा वसंतदादा साखर कारखान्याने ३१ मार्चला कारखाना बंदचे जाहीर निवेदन दिले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घ्यावा. सर्व कारखानदारांची बैठक घेऊन १०० टक्के ऊसाच्या गाळफाचे आदेश द्यावेत. तोपर्यंत कारखाने बंद करू नयेत असेही आदेश द्यावेत.... तर कारखान्याच्या अध्यक्षांच्या घरासमोर आंदोलनगाळपापूर्वीच कारखाने बंद करणाऱ्या कारखान्यांच्या अध्यक्षाच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा खराडे यांनी दिला. तशी वेळ येऊ नये यासाठी कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊसाच्या कांड्याचे गाळप होईल याची दक्षता घ्यावी असे ते म्हणाले.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना