शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

Sugarcane: शेतातील शिल्लक ऊस जाणार तरी कधी? बळीराजाला सतावतेय चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 9:52 PM

शेतकऱ्यांना चिंता : नऊ कारखान्यांचे गाळप ३१ मार्चला होणार बंद, १५ लाख टन ऊस शिल्लक

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यात १५ लाख २१६४ टन ऊस शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्यामुळे ऊसतोड मजुरांना परतीचे वेध लागले आहेत. यातच शिल्लक उसाचा प्रश्न भेडसावत आहे. साखर कारखानदारांनी शंभर टक्के उसाचे गाळप करूनच हंगाम बंद करू, असा विश्वास व्यक्त केला आहे. तेरा कारखान्यांचा ३१ मार्चपर्यंत, तर चार कारखान्यांचा हंगाम १५ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

जिल्ह्यातील १८ कारखान्यांपैकी पाच कारखान्यांचा गळीत हंगाम बंद राहिला. यातच उसाचे क्षेत्रही २० टक्क्यांनी वाढले. तेराच कारखान्यांचा हंगाम सुरू राहिल्यामुळे शिल्लक उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिराळा तालुक्यात शिल्लक उसाचा फारसा प्रश्न नाही. शिल्लक ऊस जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज तालुक्यात सर्वाधिक आहे. सध्या या ठिकाणी कर्नाटकातील अथणी, शिवशक्ती, उगार शुगरसह कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सात कारखान्यांची तोड सुरू आहे. पलूस, कडेगाव तालुक्यातही साडेसहा लाख टन ऊस शिल्लक असून, तो संपविण्यासाठी क्रांती, सोनहिरा, उदगिरी शुगर कारखाना व्यवस्थापनाचे प्रयत्न सुरू आहेत.

वाळवा, मिरज, पलूस तालुक्यातील हुतात्मा, राजारामबापू, वारणा कारखान्यांचीही तोड दाखल आहे. शिल्लक ऊस संपवून जिल्ह्यातील तेरा कारखान्यांपैकी नऊ कारखान्यांचा गळीत हंगाम दि. ३१ मार्चला बंद होणार आहे. उर्वरित क्रांती, सोनहिरा, उदगिरी शुगर आणि श्रीश्री रवीशंकर या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात शिल्लक ऊस जास्त असल्यामुळे ते दि. १५ एप्रिलपर्यंत चालणार आहेत.

जिल्ह्यातील शिल्लक ऊस

तालुका शिल्लक ऊसवाळवा ३२४०००

पलूस ३२६२२३कडेगाव ३२१५४०

खानापूर ५२१०२क. महांकाळ ११२०००

जत    ७०२९९आटपाडी ४५०००

मिरज १५००००तासगाव १०१०००

एकूण १५०२१६४

जिल्ह्यात शिल्लक उसाचा प्रश्न फारसा निर्माण होणार नाही. खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळमध्येच शिल्लक उसाचा प्रश्न आहे; पण तेथेही कर्नाटकातील चार कारखान्यांसह आमचीही तोड तेथे आहे. ३१ मार्चपूर्वी सर्व उसाचे गाळप होईल. शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही.-आर. डी. माहुली, व्यवस्थापकीय संचालक, राजारामबापू कारखाना.

७७ लाख टन उसाचे गाळप

जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी शनिवार, दि. ५ मार्चपर्यंत ७७ लाख टन उसाचे गाळप करून ८५ लाख ३१ हजार ३५१ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. हंगामात सरासरी उतारा ११.१९ टक्केच राहिला आहे. कारखान्यांच्या साखर उताऱ्यातील चोरीचा शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठविणाऱ्या संघटना गप्प आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीSangliसांगली