शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

Sangli: टेंभूच्या पाण्यावरून शिंदेसेना-भाजपात जुंपली, बाबर-पडळकर समर्थक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:09 IST

श्रेयवादाचा मुद्दा उफाळला

दिलीप मोहितेविटा : खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथे बंदिस्त पाइपलाइनद्वारे येणारे टेंभूचे पाणी बंद केल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सायंकाळी टेंभूच्या अधिकाऱ्यांना कोंडून घातले. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुहास बाबर यांना लक्ष्य करीत त्यांनीच पाणी बंद करण्यास सांगितल्याचा आरोप केला.त्यामुळे आमदार बाबर समर्थक कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. परिणामी, टेंभूच्या पाण्यावरून शिंदेसेना व भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षांत जुंपली असून, आमदार बाबर व आमदार गोपीचंद पडळकर समर्थक आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पाण्यावरून आता श्रेयवादाचा मुद्दा उफाळला आहे. ढवळेश्वर येथे नेवरी वितरिकेतून टेंभूचे पाणी सोडण्यात आले. परंतु, हे पाणी अवघ्या तासाभरातच बंद झाल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी थेट विट्यातील टेंभूचे कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना पाणी का बंद केले? असा जाब विचारला.

परंतु, अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यावेळी आमदार बाबर यांनीच अधिकाऱ्यांना सांगून पाणी बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोप आमदार पडळकर समर्थकांनी करत आमदार बाबर यांचा निषेध केला. त्यामुळे आमदार बाबर समर्थक कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले. गुरुवारी नेवरी वितरिकेजवळच्या बंधाऱ्यावर आमदार बाबर समर्थक शंभरहून अधिक शेतकरी एकत्रित आले. त्यांनी या घटनेचा निषेध करीत आमदार बाबर यांची बदनामी खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला.

पाणी देऊन न्याय देण्याची शेतकऱ्यांची मागणीया प्रकारामुळे राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या भाजप व शिंदेसेनेतील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत शेतीपिके करपून जाऊ लागली असून, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी टेंभूच्या पाण्यात कोणताही श्रेयवाद न आणता शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी देऊन न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाGopichand Padalkarगोपीचंद पडळकर