शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

टेंभूच्या सुर्ली कालव्यात अडविलेले पाणी पळविले

By admin | Published: April 20, 2016 11:58 PM

पुन्हा फोडाफोडी : नेर्ली येथील प्रकार

कडेगाव : टेंभू योजनेच्या सुर्ली कालव्यात नेर्ली हद्दीत तुंबा (बांध) घालून अडवलेले पाणी ओढ्याद्वारे कडेगाव तलावात सोडलेले पाणी अज्ञातांनी नेर्ली हद्दीत फोडले. यामुळे कडेगाव तलावात जाणारे पाणी बंद झाले. टेंभू योजनेच्या सुर्ली कालव्याद्वारे सुर्ली, खंबाळे, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे या गावांना पाणी दिले जाते. कडेगाव येथील पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून या सुर्ली कालव्यात नेर्ली हद्दीत मुरूम आणि माती घालून पाणी अडवले आहे. अडवलेले पाणी नेर्ली ओढ्यात सोडले आहे. नेर्ली ओढ्यातून योजनेचे पाणी कडेगाव तलावात सोडले आहे. गुढीपाडव्यापासून कडेगाव तलावात पाणी सुरू आहे. दरम्यान, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे या तीनही गावांना याच कालव्यातून पाणी पुढे जाते. या गावांमध्येही भीषण पाणी टंचाई आहे. परंतु प्रशासनाच्या आदेशानुसार फक्त कडेगाव तलावात पाणी सोडले आहे. कडेगाव तलावात पाणी सोडण्यासाठीही केवळ एकच पंप सुरू केला आहे. नेर्ली ओढ्यातूनही विद्युत मोटारीद्वारे पाणी उपसा करीत आहेत. यामुळे कडेगाव तलावाची पाणीपातळी वाढलेली नाही. दरम्यान, नेर्ली, अपशिंगे, कोतवडे येथील ग्रामस्थही पाणी टंचाईने हैराण झाले आहेत. यामुळे येथील काही अज्ञातांनी मंगळवारी रात्री सुर्ली कालव्यामध्ये मुरूम, माती टाकून टेंभू योजनेच्या प्रशासनाने अडवलेले पाणी फोडून पुढे नेले. पाणी अडवण्यासाठी घातलेला मुरूम-मातीचा कालव्याच्या आतील तुंबा फोडला आहे. कालवा फोडला अशी सर्वत्र चर्चा झाली, परंतु कालवा फोडलेला नाही, येथील तुंबा फोडला आहे. दरम्यान, टेंभूच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी पाणी पुन्हा अडवून तलावाकडे सोडण्याचे काम सुरू केले. कालव्यात अडवलेले पाणी फोडून पुढे पळवणाऱ्या अज्ञातांविरुध्द कडेगाव पोलिसात शाखा अभियंता दीपक निर्मळे यांनी तक्रार दिली. (वार्ताहर)तीनपैकी एकच पंप सुरूटेंभू योजनेच्या सुर्ली कालव्याद्वारे पाणी सोडण्यासाठी तीन पंप आहेत. परंतु यापैकी दोन नादुरूस्त आहेत. केवळ एका पंपाद्वारे कडेगाव तलावात पाणी सोडून तलावाची पाणी पातळी वाढणार नाही. कारण मागे ओढ्यावरही पाणी उपसा सुरू असतो. उर्वरित दोन्ही पंप दुरूस्त करुन पूर्ण क्षमतेने पाणी सोडल्यास कडेगाव तलावासह नेर्ली, अपशिंगे, कोतवडे, तडसर आदी गावांनाही सुर्ली कालव्याद्वारे पाणी देता येईल.