शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

मालगावमध्ये सुरेश खाडे यांना गावबंदीचा निर्णय

By admin | Published: February 11, 2016 12:23 AM

गरामसभेत ठराव : ‘म्हैसाळ’ पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध

मालगाव : म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष करणारे आ. सुरेश खाडे यांच्या भूमिकेवर मालगाव (ता. मिरज) येथील ग्रामसभेत हल्लाबोल करण्यात आला. पूर्वभागातील जनतेला वाऱ्यावर सोडत पाणीप्रश्नी सोयीची भूमिका घेणाऱ्या आमदारांना गावबंदी करण्याच्या मागणीचा ठराव घेण्यासही संतप्त ग्रामस्थांनी भाग पाडले.मालगाव येथील प्रजासत्ताकदिनी तहकूब करण्यात आलेली ग्रामसभा सरपंच प्रशांत माळी यांच्या अध्यक्षतेखाली व जि. प. सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, उपसरपंच शशिकांत कनवाडे, गटनेते प्रदीप सावंत यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडली. ग्रामसभा म्हैसाळ योजनेच्या पाणीप्रश्नावरुन गाजली. राज्य शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे योजनेचे आवर्तन लांबल्याने पाण्याच्या भरवशावर उभ्या केलेल्या द्राक्ष, केळी, डाळिंबबागा, पानमळे उद्ध्वस्त होत आहेत. अशा बिकटप्रसंगी मिरजेचे आमदार सुरेश खाडे नेमके आहेत तरी कोठे, असा संतप्त सवाल सभेत करण्यात आला. निवडणुकांत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करून देऊ, असे सांगणारे आ. खाडे यांच्या पक्षाच्या शासनाने शेतकऱ्यांच्या सात-बारावर म्हैसाळ योजनेच्या थकबाकीचा बोजा चढवला. आ. खाडे यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत, शेतकरी संघटनेचे संजय खोलकुंबे, महेश सकपाळ, विजय खोलकुंबे, बाबासाहेब पाटील व भास्कर भंडारे यांनी, म्हैसाळ योजनेचे पाणी सुटेपर्यंत आ. खाडे यांना गावबंदी करण्याची मागणी केली. या मागणीवर एकवटलेल्या ग्रामस्थांनी गावबंदीचा तसा ठराव करण्यास भाग पाडले. सभेत आ. खाडे यांच्या कार्यपध्दतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सभेत १४ व्या वित्त आयोगाच्या निधीचे प्रभागात समान वाटप करण्याची मागणी अरुण धामणे यांनी केली. पूर्वीची कर आकारणी रद्द होऊन, शासन आदेशानुसार भांडवली मूल्यांकनावर आधारित घरपट्टी वसुली पध्दत राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी मनोहर धेंडे यांनी सांगितले. सभेस ग्रामपंचायत सदस्य राजू भानुसे, सतीश बागणे, अशोक सावळे, विलास होनमोरे, अस्लम मुजावर, महाबुबी मुजावर, मंगल खांडेकर, रुपाली माळी, लता जत्ते, स्मिता कुंभारकर, अनिता माळी, सुरेखा कुंभार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)