शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

धनगरवाडा जमिनीबाबत १५ दिवसांत सर्वेक्षण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:32 AM

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : वनविभागाने धनगरवाडा व विनोबा ग्राममधील जमीन येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे ही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : वनविभागाने धनगरवाडा व विनोबा ग्राममधील जमीन येथील शेतकऱ्यांना दिली असताना पुन्हा वनविभागाच्या नावे ही जमीन कशी नोंद झाली. याबाबत वन्यजीव विभागाने १५ दिवसांत सर्वेक्षण करावे. तसेच सातारा येथून आठ दिवसांत याबाबत कागदपत्रे आल्यानंतर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक घेऊन, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले.

येथील तहसीलदार कार्यालयात धनगरवडा व विनोबाग्राम येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत वन व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, प्रांताधिकारी संपत खिलारे, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, उपवनसंरक्षक विजय माने, तहसीलदार गणेश शिंदे, सहाय्यक उपवनसंरक्षक पी. आर. गावडे, सम्राटसिंह नाईक, विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

जलसंपदा मंत्री पाटील म्हणाले की वनविभागाचे नाव ७/१२ वरून कमी करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून नागपूर व दिल्ली येथून प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पाठवा. यासाठी आपण स्वतः व आमदार मानसिंगराव नाईक जातीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावणार.

आमदार नाईक यांनी, नोंदीबाबत वन व महसूल विभागात वाद आहे. त्यात नागरिकांना कशाला अडचणीत आणता. ३० वर्षे झाले विनाकारण त्रास देण्यासाठी हे करत आहात. त्यांच्याच जमिनीसाठी तुम्ही त्यांनाच रडवता, अशा शब्दांत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी नगराध्यक्षा सुनीता निकम, उपसभापती बी. के. नायकवडी, विजयराव नलवडे, विश्वास कदम, वनक्षेत्रपाल सुशांत काळे, सुरेश चिल्लावार, वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, महादेव कदम, अरविंद माने, सरपंच वसंत पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.