शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
2
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
3
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
6
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
7
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
8
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
9
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
10
हिजबुल्लाहच्या नसरल्लाहचा 'खात्मा'; आता खामेनेईंचं टेनन्शन वाढलं; इस्रायलवर भडकले अन् अंडरग्राउंड झाले!
11
"महालक्ष्मी ब्लॅकमेल करत होती, म्हणून ५९ तुकडे..."; बंगळुरू हत्येतील आरोपीच्या भावाचा मोठा दावा
12
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
13
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
14
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
15
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
16
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
17
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
18
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“...तर शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे मराठा आंदोलन करत होते स्पष्ट”: प्रकाश आंबेडकर
20
देशातील टॉप १० श्रीमंत देवस्थानांच्या यादीत राम मंदिर; किती कोटींचे दान मिळाले? आकडा पाहाच

बेदाणा व्यापाऱ्यांवर कारवाई करणार

By admin | Published: April 29, 2016 11:19 PM

बाजार समितीचा निर्णय : बाजार समिती प्रशासन-व्यापाऱ्यांत बैठक

सांगली : खरेदीदारांकडून वेळेत पेमेंट येत नसल्यामुळे अडते व व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना बेदाण्याचे पैसे देण्यास विलंब होत आहे. यामुळे अडचणी निर्माण होत असून खरेदीदार व्यापाऱ्यांकडून ४० दिवसात पेमेंट न आल्यास ‘त्या’ व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बाजार समिती प्रशासन व अडते-व्यापाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी बाजार समितीने ठाम भूमिका घेत तोडगा काढावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. पेमेंटच्या विलंबाबाबत समितीने बेदाणा व्यापारी व अडते यांची शुक्रवारी बैठक बोलावली होती. बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. खरेदीदार व्यापाऱ्यांकडून अडत्यांना ७५ दिवसांपर्यंत उशिरा रक्कम मिळत आहे. ३५ ते ४० दिवसात रक्कम देण्याचा नियम असताना, रक्कम उशिरा मिळत असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. बाजार समितीने याबाबत तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी अडते-व्यापाऱ्यांनी केली. यावेळी तारीख ते तारीख पेमेंट मिळावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. ८० ते ९० दिवसात जर पेमेंट मिळणार असेल, तर सौदे बंद करण्याचा इशाराच यावेळी व्यापाऱ्यांनी दिला. बाजार समितीने याबाबत ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली. गुळाची रक्कम १५ दिवसात येते, हळदीचे पैसे ३० दिवसात येतात, तर बेदाण्याचीच रक्कम ७५ दिवसांपर्यंत उशिरा का येते? असा सवालही व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. सांगली बाजार समितीत स्वतंत्र ‘बॅन कमिटी’ स्थापण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी बाजार समितीचे सचिव प्रकाश पाटील यांनी, ठरलेल्या वेळेत व्यापाऱ्यांची रक्कम न देणाऱ्या खरेदीदार व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. शनिवारी पुन्हा सभापती संतोष पाटील यांच्या उपस्थितीत यावर सर्वमान्य तोडगा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)