शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

कर्ज घेऊ, पण पाणी देऊ

By admin | Published: April 22, 2016 11:02 PM

गिरीश महाजन : मानकरवाडी तलावात ‘वाकुर्डे’च्या पाण्याचे पूजन

शिराळा : युती शासनास शेतकऱ्यांसाठी कितीही कर्ज घ्यावे लागले तरी चालेल, ते कर्ज घेऊन येत्या दोन वर्षात अपुऱ्या सर्व पाणी योजना पूर्ण करु, नंतरच नवीन योजना मंजूर करु, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले.अंत्री बुद्रुक (ता. शिराळा) येथे मानकरवाडी तलावात सोडण्यात आलेल्या पाण्याचे पूजन व वचनपूर्ती निर्णय आयोजित शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.महाजन म्हणाले की, पाण्याचे महत्त्व शेतकऱ्यांनाच समजते. या मतदारसंघात दुष्काळ भीषण आहे हे पाहिले आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून हे सरकार काम करील. याअगोदरच्या शासनाने ७० हजार कोटी खर्च केले. मात्र शेतकऱ्यांना पाणीच नाही मिळाले. त्यांनी नियोजन केले नाही. त्यांच्या शासनातील अनेक गडबड घोटाळे बाहेर येत आहेत. एक माजी मंत्री तुरुंं गात आहेत. बाकीचे तुरुंगात जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. येथील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी निधी देणे गरजेचे आहे. हे पैसे मिळाले तरच हा विभाग सुजलाम सुफलाम होईल. यावेळी खासदार संजयकाका पाटील, खासदार राजू शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, नीता केळकर, राहुल महाडिक, विक्रमभाऊ पाटील, सदाभाऊ खोत, अभिजित नाईक, सर्जेराव यादव, सत्यजित नाईक, विजयराव यादव, उत्तमराव निकम, यशवंत दूध संघाचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, नामदेव पाटील आदी उपस्थित होते.सुखदेव पाटील यांनी स्वागत केले, रणधीर नाईक यांनी प्रास्ताविक केले, तर प्रकाश पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)