शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
3
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
4
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
5
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
6
Suraj Chavan : "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
7
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
8
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
9
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
10
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
11
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
12
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
13
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
14
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
15
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
16
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
17
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
18
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
19
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
20
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला

‘टेंभू’च्या गैरव्यवस्थापनाने ‘ताकारी’ बंद

By admin | Published: April 19, 2016 12:06 AM

गरजेपेक्षा जादा पाणीसाठा : ‘ताकारी’ची पाणी पातळी खालावली

प्रताप महाडिक--कडेगाव -टेंभू उपसा सिंचन प्रकल्प योजनेच्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे ताकारी योजना अचानक बंद झाली. चालूवर्षी सलग तिसऱ्या आवर्तनालाही असा प्रकार घडल्यामुळे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कऱ्हाड तालुक्यातील टेंभू येथील पाणी साठवण बंधाऱ्यात गरजेपेक्षा जादा पाणीसाठा करून टेंभूच्या अधिकाऱ्यांनी पाणी अडवून ठेवले आहे. यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्याची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे ताकारी उपसा सिंचन योजना अचानकपणे रविवारी सायंकाळी पाच वाजता बंद पडली.ताकारी व टेंभू या दोन्ही सिंचन योजनांसाठी कोयना धरणातून पाणी सोडले जाते. ताकारी तसेच टेंभू योजना आणि कृष्णा नदीवरील अन्य सर्व पाणी वितरण व व्यवस्थापनाचे अधिकार सांगली पाटबंधारे विभागाकडे दिले आहेत. ताकारी व टेंभू या दोन्ही योजना आवर्तनासाठी आवश्यक पाणी मागणी सांगली पाटबंधारे विभागाकडे करतात. योजनांच्या मागणीप्रमाणे सांगली विभागाकडून कोयना धरणातून पाणी सोडले जाते. सोडलेले पाणी प्रथम टेंभू योजनेच्या टेंभू (ता. कऱ्हाड) येथील पाणी साठवण बंधाऱ्यात जाते. टेंभू बंधाऱ्यात गरजेप्रमाणे आवश्यक पाणी पातळी ठेवून ताकारी तसेच कृष्णा नदीवरील अन्य उपशासाठी जादा आलेले पाणी टेंभूच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या साठवण बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पुढे सोडणे गरजेचे आहे. तशा सूचना सांगली पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदारीने देतात. यामुळे ताकारी योजनेसाठी आवश्यक पाणीसाठा या योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यात होतो. परंतु सांगली पाटबंधारे विभागाच्या सूचनांचे पालन न करता टेंभू योजनेचे अधिकारी आवश्यकतेपेक्षा जादा पाणी अडवून ठेवतात. यामुळे ताकारी योजनेला आवश्यक असणारी ५४० ते ५४१ मीटर पाणी पातळी साटपेवाडी बंधाऱ्यात मिळत नाही. काल, रविवारी सायंकाळी पाच वाजता ताकारी योजनेची पाणी पातळी खालावली आणि योजना बंद पडली. मागील दोन्ही आर्वतनातही अशाप्रकारे ताकारी योजना बंद पडली, याला टेंभूचे गैरव्यवस्थापनच कारणीभूत आहे.ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होऊन महिना झाला. ताकारीचे पाणी १०० किलोमीटरवर तासगाव तालुक्यातील विसापूरच्या जवळपास पोहोचले होते. आता योजना अचानक बंद झाली. मुख्य कालवा कोरडा पडला आहे. आता पुन्हा योजना सुरू करून १०० किलोमीटरपर्यंत पाणी जाण्यासाठी किमान दोन दिवस लागतील. या दोन्ही दिवसातील पाण्याचा अपव्यय आणि वीज बिलाचा भुर्दंड ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कार्यवाही न करणाऱ्या टेंभूच्या संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून होत आहे. ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभागामार्फत ताकारीची आवर्तने नियमित मिळत असताना आणि पाणीपट्टी वसुली चांगली असताना असे कृत्रिम अडथळे निर्माण होत असल्यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अधिकारी बेजबाबदार : कारवाईची मागणीऐन दुष्काळात जबाबदारीचे भान ठेवून टेंभूचे अधिकारी काम करीत नाहीत. सांगली विभागाच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करीत नाहीत. गरजेपेक्षा जादा पाणीसाठा करून ठेवत आहेत. यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्याची पाणीपातळी खालावली आणि ताकारी योजना बंद पडली. ही घटना सलग तीन आर्वतनात घडली. याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.