शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी आले.. पण प्रश्न नाही सुटले, पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडींचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 1:55 PM

शेतकरी संघटित असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागात पाणी देण्याचे स्वप्न बघितले. लोकांना विश्वासात घेतले. आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे.

आटपाडी : टेंभूचे पाणी सध्या बहुतांश दुष्काळी तालुक्यामध्ये आले असले तरी, पाणी आल्यामुळे प्रश्न सुटले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना संघटित ठेवून चळवळीच्या रेट्यातून दुष्काळी भागाचे प्रश्न सोडविण्याला यापुढील काळात प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन तेरा दुष्काळी तालुक्यांच्या पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी केले.राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळी तालुक्यांची २९ वी पाणी संघर्ष परिषद रविवारी आटपाडी येथे पार पडली. यावेळी डॉ. बाबूराव गुरव, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, चंद्रकांत देशमुख, प्रा. शिवाजीराव काळुंगे, सुभाष पाटील, आर. एस. चोपडे, डॉ. अनिकेत देशमुख, महादेव देशमुख, शिवाजीराव पाटील, सावंता पुसावळे, सचिन देशमुख उपस्थित होते.वैभव नायकवडी म्हणाले, शेतकरी संघटित असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागात पाणी देण्याचे स्वप्न बघितले. लोकांना विश्वासात घेतले. आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे. तेरा दुष्काळी तालुक्यांतील अपुरी कामे पूर्ण होण्यासाठी पैसे उपलब्ध होणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी गरजेप्रमाणे धडक मारण्याची तयारी ठेवली पाहिजे. चळवळीच्या रेट्यामुळे काही योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्या यशस्वीरीत्या चालविण्यासाठी यापुढील काळात लढा असेल.पाणी आलेल्या भागातील शेतकऱ्यांनी चळवळीत सहभाग होणे गरजेचे आहे. २९ वर्षांपूर्वी जे स्वप्न होते, ते आता सत्यात यायला लागले आहे. नवीन पिढीला सामावून घेणे व त्यांच्यापुढे इतिहास मांडणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या संघटित ताकदीशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. यामुळे आपल्याला संघटनेची ताकद वाढवणे गरजेचे आहे. भविष्यातील संघर्षासाठी आपण तयार राहूया.डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, आज दुष्काळी भागात पाणी आले आहे. मात्र ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अजून पाेहाेचले नाही. समन्यायी पाणी वाटप योजनेचे अद्याप शासनाने नियोजन केले नाही. यासाठी चळवळीच्या माध्यमातून जनरेटा उभा करावा लागेल.

राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, सध्या निसर्ग लहरी बनला आहे. शासनही लहरी बनले आहे. त्यांच्या लहरीप्रमाणेच पाण्याचे आवर्तन सुरू आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आवर्तनाच्या नियोजनासाठी चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दादासाहेब ढेरे, शिवाजीराव पाटील, सुभाष पाटील, आर. एस. चोपडे, चंद्रकांत देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, प्रा. शिवाजीराव काळुंगे आदींनी मनोगत व्यक्त केले.

नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी एक एकर जागा

आमच्या आटपाडीसारख्या दुष्काळी भागावर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे फार मोठे ऋण आहेत. त्यांचा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठीचा लढा मोठा आहे, हे येणाऱ्या नवीन पिढीला उमजावे यासाठी आटपाडीमध्ये डॉ. नागनाथअण्णांचे स्मारक उभारण्याचा संकल्प आहे. यासाठी एक एकर जागा देणार असल्याचे राजेंद्रअण्णा देशमुख यांनी यावेळी जाहीर केले.

टॅग्स :Sangliसांगली