शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
3
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
4
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
5
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
6
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
7
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
8
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
9
धक्कादायक! गणवेश परिधान करून न आल्याने शिक्षकाकडून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
10
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
11
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
12
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
13
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
14
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
15
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
16
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
17
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
18
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
19
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
20
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच

सांगली जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजणार; लोकसभा, विधानसभा लढतीची रंगीत तालीम होणार

By अशोक डोंबाळे | Published: August 31, 2023 3:47 PM

ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी नेत्यांचे कार्यकर्त्यांना बळ

अशोक डोंबाळे

सांगली : जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदार याद्या, प्रभागांचे आरक्षण निश्चित झाले आहे. कोणत्याही क्षणी जिल्हा प्रशासन निवडणुका घोषित करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणूनच भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून आहेत. ग्रामीण राजकारणाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींवर आपलेच वर्चस्व राहिले पाहिजे, यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे.जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या, काही नगरपंचायतींवर प्रशासक आहे. यात भर म्हणून ८६ ग्रामपंचायतींमध्येही प्रशासक असल्यामुळे दुसऱ्या फळीतील नेतृत्वामधील नेत्यांविरोधात प्रचंड असंतोष खदखदत आहे. लोकसभा निवडणुका डिसेंबर २०२३ ते मे २०२४ पर्यंत केव्हाही होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पूर्वी ग्रामीण मतदारांचा कल समजून घेण्यासाठी ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणूका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहेत. अधिकाऱ्यांनी तसे संकेतही दिले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. 

प्रशासनाचा हा अंदाज घेऊन भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवेसनेच्या नेत्यांनी ग्रामपंचायती आपल्या ताब्यात खेचून आणण्यासाठी रणनीत आखली आहे. नेत्यांकडून कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने बळही दिले जात आहे. सर्वाधिक २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शिराळा तालुक्यात होत असून राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजपचे सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांनी सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या गटाकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात १९ आणि आटपाडी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. 

या दोन्ही तालुक्यांत राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीचा परिणाम होणार आहे. भाजपचे माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख गटग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आमदार सुमनताई पाटील, खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटानेही माेर्चेबांधणी सुरू केली आहे. 

जत, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यांमध्ये दोन ते पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. संख्या कमी असली तरी मोठ्या ग्रामपंचायतीमुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत निर्णायक अशी गावे आहेत. त्यामुळे या तालुक्यातील नेत्यांचेही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर लक्ष आहे. कारण, या ग्रामपंचायतींवर लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील राजकारण सोपे जाणार आहे.

या ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळीतालुका - संख्याशिराळा - २९आटपाडी - १६क.महांकाळ - १९जत - ५मिरज - ३तासगाव - २खानापूर - ३पलूस - ३वाळवा - ४कडेगाव - २

ग्रामपंचायतींवरही 'प्रशासक'राजजिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींमधील सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे तेथे सध्या प्रशासकांची नियुक्ती आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या सूचनेनुसार आरक्षण सोडत काढण्यासह मतदार याद्या तयार केल्या आहेत. कोणत्याही क्षणी ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाकडून सूचना येताच घेण्यात येतील. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक