शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

मागील हिशेब द्या, मगच साखर कारखाने सुरू करा - राजू शेट्टी 

By अशोक डोंबाळे | Published: September 08, 2023 6:17 PM

येत्या बुधवारी कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा

सांगली : मागील गळीत हंगामासाठी गेलेल्या उसाचा हिशेब दिल्याशिवाय यावर्षी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला. गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाचे एफआरपीवर प्रतिटन ४०० रुपये मिळावेत, या मागणीसाठी बुधवार, १३ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राजू शेट्टी म्हणाले, माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याने एफआरपीवर प्रतिटन ४०० रुपये दिले आहेत. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपीवर ४०० रुपये दिले नाहीत. वास्तविक पाहता गतवर्षी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होते, त्यावेळी साखर प्रतिक्विंटल तीन हजार १०० रुपये होती. ती गृहित धरून दराची मागणी केली होती. सध्या साखर प्रतिक्विंटल तीन हजार ८०० ते तीन हजार ९०० रुपये आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल साखरेला ७०० रुपये जादा मिळत आहेत. त्यामुळे गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाला एफआरपीपेक्षा ४०० रुपये कारखान्यांनी दिलेच पाहिजेत. कारखान्यांनी मागील गळीत हंगामाचा हिशेब द्यावा, त्यानंतरच कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करावेत. या मागणीसाठी कोल्हापुरात १३ सप्टेंबरला मोर्चा काढणार आहे. तरीही कारखान्यांनी गळीत हंगाम चालू करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरीच कारखान्यांचे गळीत हंगाम बंद पाडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळ जाहीर करायंदा पाऊस नाही, खरीप वाया गेला आहे. जे नुकसान झाले ते भरून निघणारे नसल्याने राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. नैसर्गिक आपत्तीत विमा योजनेची शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. पण, सरकारच्या मध्यस्थीने विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.मराठा आंदोलनास पाठींबामराठा आरक्षणाचा संसदेमध्ये २०११ मध्ये सर्वप्रथम मी प्रश्न मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. आरक्षणासाठी राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. राज्यातील ९५ टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने मराठा समाजापुढे आर्थिक दारिद्र्य निर्माण झाले आहे. समाजाला भक्कम करायचे असेल तर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी