शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

मागील हिशेब द्या, मगच साखर कारखाने सुरू करा - राजू शेट्टी 

By अशोक डोंबाळे | Updated: September 8, 2023 18:21 IST

येत्या बुधवारी कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा

सांगली : मागील गळीत हंगामासाठी गेलेल्या उसाचा हिशेब दिल्याशिवाय यावर्षी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिला. गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाचे एफआरपीवर प्रतिटन ४०० रुपये मिळावेत, या मागणीसाठी बुधवार, १३ सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.राजू शेट्टी म्हणाले, माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याने एफआरपीवर प्रतिटन ४०० रुपये दिले आहेत. मात्र सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील एकाही कारखान्याने एफआरपीवर ४०० रुपये दिले नाहीत. वास्तविक पाहता गतवर्षी साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होते, त्यावेळी साखर प्रतिक्विंटल तीन हजार १०० रुपये होती. ती गृहित धरून दराची मागणी केली होती. सध्या साखर प्रतिक्विंटल तीन हजार ८०० ते तीन हजार ९०० रुपये आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना प्रतिक्विंटल साखरेला ७०० रुपये जादा मिळत आहेत. त्यामुळे गतवर्षी गाळपास गेलेल्या उसाला एफआरपीपेक्षा ४०० रुपये कारखान्यांनी दिलेच पाहिजेत. कारखान्यांनी मागील गळीत हंगामाचा हिशेब द्यावा, त्यानंतरच कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू करावेत. या मागणीसाठी कोल्हापुरात १३ सप्टेंबरला मोर्चा काढणार आहे. तरीही कारखान्यांनी गळीत हंगाम चालू करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरीच कारखान्यांचे गळीत हंगाम बंद पाडतील, असा इशाराही त्यांनी दिला.

दुष्काळ जाहीर करायंदा पाऊस नाही, खरीप वाया गेला आहे. जे नुकसान झाले ते भरून निघणारे नसल्याने राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली. नैसर्गिक आपत्तीत विमा योजनेची शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. पण, सरकारच्या मध्यस्थीने विमा कंपन्या शेतकऱ्यांना लुटत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.मराठा आंदोलनास पाठींबामराठा आरक्षणाचा संसदेमध्ये २०११ मध्ये सर्वप्रथम मी प्रश्न मांडत केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते. आरक्षणासाठी राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा आहे. राज्यातील ९५ टक्के मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने मराठा समाजापुढे आर्थिक दारिद्र्य निर्माण झाले आहे. समाजाला भक्कम करायचे असेल तर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेRaju Shettyराजू शेट्टी