शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

सांगली जिल्ह्यात गेल्या २० वर्षांतील नीचांकी पेरणी, कडधान्याचे क्षेत्र घटण्याची शक्यता

By अशोक डोंबाळे | Updated: July 5, 2023 11:53 IST

खते, बियाणे विक्री करणारी दुकाने ओस

सांगली : जिल्ह्यात आतापर्यंत किमान १३५.५ मिलिमीटरपर्यंत पाऊस होणे अपेक्षित असताना केवळ ५.५ टक्केच झाला आहे. परिणामी जिल्ह्यात खरीप पेरण्या गेल्या २० वर्षांतील नीचांकी म्हणजे केवळ ५.२६ टक्के झाल्या आहेत. खरीप पेरण्या लांबल्यामुळे कडधान्याचे पेरणी क्षेत्रही घटण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात दोन लाख ५५ हजार ९८४ हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र आहे. यापैकी २८ जून २०२३ पर्यंत केवळ १३ हजार ४५८.५ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे ५.२६ टक्केच पेरणी झाली आहे. गेल्या २० वर्षांतील खरीप पेरण्यांची आकडेवारी लक्षात घेतल्यास जवळपास ३५ ते ६० टक्केपर्यंत जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी होत होती, तसेच मान्सून पाऊसही १०० मिलिमीटरपर्यंत होत होता; परंतु यावर्षी जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यास सुरुवात झाली आहे.तरीही जिल्ह्यात ५.५ टक्केच पाऊस झाल्याची सांगली पाटबंधारे विभागाची माहिती आहे, तसेच केवळ ५.२६ टक्के खरीप हंगामाची पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. पाऊस आणि खरीप पेरण्यांची आकडेवारी चिंताजनक आहे. कडधान्याचे पेरणी क्षेत्रही जिल्ह्यात घटण्याची शक्यता असल्याचे कृषी तज्ज्ञांचा अहवाल आहे. धूळ वाफेवर झालेले भात पीकही अडचणीत आले आहे.जिल्ह्यात अशी झाली पेरणीतालुका - सरासरी क्षेत्र - पेरणी - टक्केवारीमिरज -२४६७१.१  - ३१३ - १.३जत - ७८२१० - ९८५.१ - १.४खानापूर - १६१०० - २०१.१ - ०.५६वाळवा - २३१२२ - ४५६ - २तासगाव - ३३१२२ - १५६ - ०.३४शिराळा - २२६०५ - १०७५० - ४५आटपाडी - १०७५० - १६३  - १.५क. महांकाळ - २१३७३.९ - १०६७.४ - ५पलूस - ६१०८ - ३०४ - ५कडेगाव - १९९१६ - ४२२ २. - ३४एकूण - २५५९८४ - १३४५८.५ - ५.२६वर्षनिहाय ३ जुलैपर्यंतची पेरणीवर्ष -   टक्केवारी२०२३    ५.२६२०२२     ३५२०२१      ३२२०२०      ४४२०१९      ५२शिराळ्यात १०१७० हेक्टरवर भाताची पेरणीशिराळा तालुक्यात भात पेरणीचे १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी १० हजार १४२ हेक्टरवर भाताची पेरणी उरकली आहे. ७४.४६ टक्के भाताची पेरणी झाली असून पावसाअभावी भात पीकही संकटात सापडले आहे. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. भात पीक जगवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहे.खते, बियाणे विक्री करणारी दुकाने ओसजिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. पाऊस झाल्यानंतर पेरणीला सुरुवात होते; परंतु पावसाने दडी मारल्याने शेतकरी बियाणे, खते खरेदीसाठीही पुढे आले नसल्याचे चित्र असल्यामुळे कृषी सेवा केंद्रे ओस पडली आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी